. वावटळ ( भाग ३ )
.
.
. लग्नाचा थाटमाट होणं शक्यच नव्हतं . नरसोबाच्या वाडीला जाऊन त्याने लग्न केलं . बाळासाहेबाच्या घरचं चिटपाखरू पण नव्हतं . हौसाच्या शेजारपाजार पैकी चार जण आली होती . अफाट वैभवाच्या वारसदाराच बिन वाजंत्रीचं लग्न झालं . बातमी कळल्यावर माझ्या संमिश्र भावना होत्या . एका भरकटलेल्या गलबताला बंदरात निवारा मिळाला म्हणून हर्ष होता आणि ही आवळ्या भोपळ्याची मोट किती दिवस , कशी टिकणार ह्याची चिंता पण होती .हे लग्न टिकाव अशी मी मनापासून प्रार्थना केली .
.
. . शाहूपुरीतल्या अलिशान तीनमजली बंगल्याचे उभे दोन भाग झाले . उत्तरेकडचा भाग बाळा साहेबाला मिळाला . दक्षिणेकडच्या भागात आबासाहेब , दादासाहेब आणि पुरा कुटुंब कबिला राहात होता . बाळासाहेबाचा हिस्सा त्याला मिळाला . पण सर्व घराने , भाउबंदानीं त्याला जणू वाळीतच टाकलं होतं .त्याच्या कडे कुणाचं येणं जाणं नव्हतं . सणवार , हौस मौज , कुलाचार , कशाचाच तो हकदार नव्हता . दोन घरांच्या मधले दरवाजे नुसतेच कडी कुलपं लावून बंद केले नव्हते , तर त्यावर लोखंडी पट्यां ठोकून कायमचे बंदिस्त केले होते . केवळ घर तोडलं नव्हतं तर एक नातंच तोडून टाकलं होतं .कुसुम सारखी अक्करमाशी , तमासागीरीण , त्यांनी बाळासाहेबाची बायको म्हणून स्वीकारली हेच खूप होतं . मनात आणलं असतं तर हौसाच्या , कुसुमच्या चिंध्या करून त्यांनी गिधाडांनी खायला घातल्या असत्या आणि ह्या कानाचं त्या कानाला कळलं नसतं .असा त्यांचा गावात वचक होता .
.
. ,कुसुम आयुष्यात आली आणि बाळासाहेब फुलारून आला . त्याच्या पौरुशाचा केवढा मोठा सत्कार झाला होता .इंद्राच्या दरबारातील अप्सरा त्याला मिळाली होती . मधाचा थेंब टाकलेल्या जांभळा सारखे गर्द , टपोरे डोळे . घनदाट झालर लावल्या सारख्या लांबसडक पापण्या , मदनाच्या ताणलेल्या धनुष्यासारख्या भुवया , तपकिरी , तजेलदार केसांच्या महिरपिखाली झाकलं जाणारं थोडं अरुंद कपाळ ., टोकाला किंचित उचलेलं , सर्व जगाला तुच्छ लेखणारं , नाजूक पारदर्शक नाकपुड्या असणारं पिटकुलं नाक . वरचा ओठ अंम्मळ अरुंद , पातळ आणि गावठी गुलाबाची पाकळी थोडी डौलदार पणे दुमडावी असा आव्हान देणारा , दळदार खालचा ओठ . सुरई सारखी , कमळाच्या देठा सारखी नाजूक मान , आंब्याच्या कोयीसारखी सुबक , थोडी टोकदार हनुवटी आणि गालावरची अमृताच्या कुपी सारखी खळी . तिला घडवून विश्वकर्मा आपल्याच कलाकृतीवर खुश झाला असणार . तिच्या यौवनाची बाळासाहेबला नशा चढली होती . सौंदर्याच्या भांडाराचा तो जहागीरदार होता . तिच्यावरून त्याने दुनिया ओवाळून टाकली होती . बेपर्वा , बिनधास्त , ,बेधडक , श्रीमंतीमुळे आलेला निर्धास्तपणा असलेल्या बाळासाहेबाला जगाची पर्वा नव्हती . त्याने कुसुमला सोन्या हिर्यांनी मढवली . तिच्या एका खुशीच्या कटाक्षासाठी अफाट दौलत उधळली . नखशिखांत दागिने आणि उंची निवडक साड्या लेवून , सगळ्यांच्या नाकावर टिच्चून ती गावभर मिरवत होती .
.
. . वडिलोपार्जित संपत्तीतून मिळालेलं अर्ध घरही प्रचंड होतं . बाळासाहेबाने त्यात तळमजल्यावर हॉटेल काढलं . ;" त्रिनेत्र " ! त्याचा विश्वासू , जिगरी दोस्त संपत , व्यवस्थापक म्हणून मिळाला . वरचे मजले दोघे नवरा बायको वापरत होते . हॉटेलला जबरदस्त बरकत आली . प्रत्येक मजल्यावर पांच पांच खोल्या होत्या . बाळासाहेबाने त्याचं रुपांतर लॉज मध्ये केलं . तिथून जवळच , ताराबाई पार्क मध्ये त्याने टुमदार , देखणा बंगला भाड्याने घेतला . दोघे तिथं राहू लागले . हा बंगला त्यांना लाभला पण आणि नाही पण लाभला !
.
. .ह्या बंगल्यातच त्यांच्या चिमुकल्याने जन्म घेतला . पण त्याने तीन सूर्योदय पण नाही पाहिले . कुसुमच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं .बाळासाहेब मुळापासून हादरला होता . खूप दुखावला होता . आपण सर्वांच्या मनाविरुद्ध लग्न केलं , त्यांचे तळतळाटच आपल्याला बाधताहेत अशी त्याची भावना झाली होती . पोराचं नाव तो ' राजा ' ठेवणार होता . ' राजासाहेब ! ' पण त्याची इछ्या अपुरीच राहिली . . कुसुम दिसामासी खंगत होती . कुढत होती , कोमेजत होती . तिला कशातही रस राहिला नव्हता . एका रसरशीत फुलवेलीच चिपाड झालं होतं .#सुरेखामोंडकर १४/०१/२०१७
.
. क्रमशः
.
.
. लग्नाचा थाटमाट होणं शक्यच नव्हतं . नरसोबाच्या वाडीला जाऊन त्याने लग्न केलं . बाळासाहेबाच्या घरचं चिटपाखरू पण नव्हतं . हौसाच्या शेजारपाजार पैकी चार जण आली होती . अफाट वैभवाच्या वारसदाराच बिन वाजंत्रीचं लग्न झालं . बातमी कळल्यावर माझ्या संमिश्र भावना होत्या . एका भरकटलेल्या गलबताला बंदरात निवारा मिळाला म्हणून हर्ष होता आणि ही आवळ्या भोपळ्याची मोट किती दिवस , कशी टिकणार ह्याची चिंता पण होती .हे लग्न टिकाव अशी मी मनापासून प्रार्थना केली .
.
. . शाहूपुरीतल्या अलिशान तीनमजली बंगल्याचे उभे दोन भाग झाले . उत्तरेकडचा भाग बाळा साहेबाला मिळाला . दक्षिणेकडच्या भागात आबासाहेब , दादासाहेब आणि पुरा कुटुंब कबिला राहात होता . बाळासाहेबाचा हिस्सा त्याला मिळाला . पण सर्व घराने , भाउबंदानीं त्याला जणू वाळीतच टाकलं होतं .त्याच्या कडे कुणाचं येणं जाणं नव्हतं . सणवार , हौस मौज , कुलाचार , कशाचाच तो हकदार नव्हता . दोन घरांच्या मधले दरवाजे नुसतेच कडी कुलपं लावून बंद केले नव्हते , तर त्यावर लोखंडी पट्यां ठोकून कायमचे बंदिस्त केले होते . केवळ घर तोडलं नव्हतं तर एक नातंच तोडून टाकलं होतं .कुसुम सारखी अक्करमाशी , तमासागीरीण , त्यांनी बाळासाहेबाची बायको म्हणून स्वीकारली हेच खूप होतं . मनात आणलं असतं तर हौसाच्या , कुसुमच्या चिंध्या करून त्यांनी गिधाडांनी खायला घातल्या असत्या आणि ह्या कानाचं त्या कानाला कळलं नसतं .असा त्यांचा गावात वचक होता .
.
. ,कुसुम आयुष्यात आली आणि बाळासाहेब फुलारून आला . त्याच्या पौरुशाचा केवढा मोठा सत्कार झाला होता .इंद्राच्या दरबारातील अप्सरा त्याला मिळाली होती . मधाचा थेंब टाकलेल्या जांभळा सारखे गर्द , टपोरे डोळे . घनदाट झालर लावल्या सारख्या लांबसडक पापण्या , मदनाच्या ताणलेल्या धनुष्यासारख्या भुवया , तपकिरी , तजेलदार केसांच्या महिरपिखाली झाकलं जाणारं थोडं अरुंद कपाळ ., टोकाला किंचित उचलेलं , सर्व जगाला तुच्छ लेखणारं , नाजूक पारदर्शक नाकपुड्या असणारं पिटकुलं नाक . वरचा ओठ अंम्मळ अरुंद , पातळ आणि गावठी गुलाबाची पाकळी थोडी डौलदार पणे दुमडावी असा आव्हान देणारा , दळदार खालचा ओठ . सुरई सारखी , कमळाच्या देठा सारखी नाजूक मान , आंब्याच्या कोयीसारखी सुबक , थोडी टोकदार हनुवटी आणि गालावरची अमृताच्या कुपी सारखी खळी . तिला घडवून विश्वकर्मा आपल्याच कलाकृतीवर खुश झाला असणार . तिच्या यौवनाची बाळासाहेबला नशा चढली होती . सौंदर्याच्या भांडाराचा तो जहागीरदार होता . तिच्यावरून त्याने दुनिया ओवाळून टाकली होती . बेपर्वा , बिनधास्त , ,बेधडक , श्रीमंतीमुळे आलेला निर्धास्तपणा असलेल्या बाळासाहेबाला जगाची पर्वा नव्हती . त्याने कुसुमला सोन्या हिर्यांनी मढवली . तिच्या एका खुशीच्या कटाक्षासाठी अफाट दौलत उधळली . नखशिखांत दागिने आणि उंची निवडक साड्या लेवून , सगळ्यांच्या नाकावर टिच्चून ती गावभर मिरवत होती .
.
. . वडिलोपार्जित संपत्तीतून मिळालेलं अर्ध घरही प्रचंड होतं . बाळासाहेबाने त्यात तळमजल्यावर हॉटेल काढलं . ;" त्रिनेत्र " ! त्याचा विश्वासू , जिगरी दोस्त संपत , व्यवस्थापक म्हणून मिळाला . वरचे मजले दोघे नवरा बायको वापरत होते . हॉटेलला जबरदस्त बरकत आली . प्रत्येक मजल्यावर पांच पांच खोल्या होत्या . बाळासाहेबाने त्याचं रुपांतर लॉज मध्ये केलं . तिथून जवळच , ताराबाई पार्क मध्ये त्याने टुमदार , देखणा बंगला भाड्याने घेतला . दोघे तिथं राहू लागले . हा बंगला त्यांना लाभला पण आणि नाही पण लाभला !
.
. .ह्या बंगल्यातच त्यांच्या चिमुकल्याने जन्म घेतला . पण त्याने तीन सूर्योदय पण नाही पाहिले . कुसुमच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं .बाळासाहेब मुळापासून हादरला होता . खूप दुखावला होता . आपण सर्वांच्या मनाविरुद्ध लग्न केलं , त्यांचे तळतळाटच आपल्याला बाधताहेत अशी त्याची भावना झाली होती . पोराचं नाव तो ' राजा ' ठेवणार होता . ' राजासाहेब ! ' पण त्याची इछ्या अपुरीच राहिली . . कुसुम दिसामासी खंगत होती . कुढत होती , कोमेजत होती . तिला कशातही रस राहिला नव्हता . एका रसरशीत फुलवेलीच चिपाड झालं होतं .#सुरेखामोंडकर १४/०१/२०१७
.
. क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा