. वावटळ ( भाग ६ )
.
.
. .बाळासाहेबाच्या सहनशक्तीचा अंत झाला . तो पिसाळलाच !" रांड , साली , छिनाल ..... तुझे धंदे काय मला माहिती नाहीत ! तुला पोर नकोय . कधीच नकोय . एकदा पोर झालं की तुझी किंमत कमी होणार . रस्त्यावरचं काळ कुत्रंही तुला विचारणार नाही . कुणाकुणा बरोबर झोपतेस मला माहिती नाही काय ? " तो गरळ ओकत होता , वर्षानुवर्षे साठलेलं .
.
. . कुसुम पण आता पिसाटली .बाळासाहेबाच्या तोंडचा शिव्यांचा वर्षाव , तिच्या चारित्र्याची केली जाणारी लक्तरं , तिला सहन होत नव्हती . बारा गावाचं पाणी प्यायलेला तिचा मूळ स्वभाव उफाळून आला . लाव्हा उसळला . निखार्यासारखा तिचा चेहरा फुलला होता . नजरेतून ठिणग्या टाकत , तिने शब्दांची आग लावली . " दिलंस काय तू मला ? चार दागिने ... भाड्याचं घर ! तुझ्याहून वरचढ , छप्पन माझ्या पायाशी लोळण घेतात , माझे तळवे चाटतात , माझ्यासमोर कुत्र्यासारखी शेपटी घोळवत , लाळ टपकवत उभे राहतात . माझ्या डोळ्यांच्या एका इशाऱ्यावर लोटांगण घालतात . तुझ्या पेक्षा तरणेबांड रोज माझ्या शेजेवर येतात ........"
.
. . बाळासाहेबाची होळी धडाडून पेटली . आपल्या बाहेरख्यालीपणाचा तिच्याच तोंडून , मोठ्या तोऱ्यात केला गेलेला स्वीकार , समर्थन , त्याच्या जिव्हारी लागलं . शब्दाने शब्द वाढत गेला . आवाज खोलीच्या बाहेर ऐकू येऊ लागले . त्याच्याच जोडीला आदळ आपटीचेही आवाज बाहेर येत होते . लॉज मधल्या , आजूबाजूच्या खोल्यांमधली माणसं धसक्याने बाहेर उभी होती ,नोकरवर्ग जमला होता .संपत बंद दार ठोकत होता . पण कोणीही दार उघडलं नाही . आतून किंकाळ्या , रडणं भेकण ; शिवीगाळ सगळं बाहेर ऐकू येत होतं . मालकाची खोली ! काय करावं कुणाला सुचत नव्हतं. हळूहळू किंकाळ्या थांबल्या . नुसताच , काहीतरी आदळल्याचा आवाज बाहेर येत होता . आणि क्षीण हुंदके ... कण्हण्याचे सुस्कारे .!
.
. , संपतने इतरांच्या मदतीने दार फोडलं . जमिनीवर कुसुम अस्ताव्यस्त पसरली होती . तिच्या छाताडावर बसून , बाळासाहेब तिच्या झिंज्या पकडून , तिचं डोकं जमिनीवर आपटत होता . त्याच्या दुसऱ्या हातात फुटलेली सोड्याची बाटली होती . त्याच्या डोळ्यातून अंगार बरसत होते . सैतानाने त्याचा ताबा घेतला होता . कुसुम मध्ये आता कण्हण्याचे पण त्राण राहिलं नव्हतं . ती निपचित पडली होती , चिंध्यांच्या बाहुली सारखी . .जमिनीवर काचांचा सडा पडला होता . रक्ताचं थारोळ झालं होतं .
.
. . बघ्यांमध्ये एकच हलकल्लोळ माजला . हाहा म्हणता तिथे शुकशुकाट झाला . आपल्याला कसली झळ लागू नये ; पोलिसांचा ससेमिरा सुरु होऊ नये , म्हणून सगळे नाहीसे झाले . तिथे स्मशान शांतता पसरली . पोलीस आले तो पर्यंत संपतने बरेच पुरावे नाहीसे करायची पराकाष्ठा केली होती . शव विच्छेदनात कुसुमचा चेहरा , मान , दोन्ही हात , हातांचे तळवे ,ह्या सर्व निळून त्र्यहात्तर लहान मोठ्या जखमा झाल्या होत्या . सगळ्या धारदार काचे मुळे झालेल्या होत्या .
.
. . कुसुमच्या मग्रुरीचा , तिच्या अर्वाच्य वर्तणुकीचा , तरुण पुरुषांना तिच्याकडे आकृष्ट करून घेणारा तिचा एकमेव आधार , तिचा चेहरा ; तोच बरबाद करायचा निश्चय बाळासाहेबाने केला होता . सर्वात जास्त घाव चेहऱ्यावर होते . स्वतःचा बचाव करण्यासाठी चेहरा झाकताना , तो सांभाळताना , कुसुमच्या हातांवर प्रहार झाले होते . ज्या चेहऱ्याने .. ज्या तिलोत्तमेने बाळासाहेबाला भुरळ घातली होती , जिच्या साठी त्याने आपल्या सामाजिक स्थानाचा , आई वडिलांचा पण विचार केला नव्हता ; " अरे नाचीला कोणी देव्हाऱ्यात बसवतं का ? तिला रखेल ठेव की " अशा व्यवहारी सल्यांना ज्याने धुत्कारलं होतं ; त्याच बाळासाहेबाने राग , क्रोध , अपमान , तिरस्कार अशा भावनांच्या आहारी जाऊन , आपल्या हाताने , आपल्या प्रेमाचा चक्काचूर केला होता .
.
. . आरोपी म्हणून पोलीस त्याला पकडून घेऊन जात होते , तेव्हां त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते . चेहरा पाषाणासारखा थिजला होता .. गारगोटी सारखे डोळे भकास होते , शरीरातील चेतनेची वाताहत झाली होती . उरलं होतं एक शुष्क , विदीर्ण , विवश , निर्माल्य ! मला कळल्यावर खूप हळहळले मी ! एक प्रेमकथा बेचिराख झाली होती . पण कोण काय करू शकणार होतं ? बुडत्याचा पाय खोलातच जाणार होता !#सुरेखामोंडकर
१५/०१/२०१७
समाप्त
.
.
. .बाळासाहेबाच्या सहनशक्तीचा अंत झाला . तो पिसाळलाच !" रांड , साली , छिनाल ..... तुझे धंदे काय मला माहिती नाहीत ! तुला पोर नकोय . कधीच नकोय . एकदा पोर झालं की तुझी किंमत कमी होणार . रस्त्यावरचं काळ कुत्रंही तुला विचारणार नाही . कुणाकुणा बरोबर झोपतेस मला माहिती नाही काय ? " तो गरळ ओकत होता , वर्षानुवर्षे साठलेलं .
.
. . कुसुम पण आता पिसाटली .बाळासाहेबाच्या तोंडचा शिव्यांचा वर्षाव , तिच्या चारित्र्याची केली जाणारी लक्तरं , तिला सहन होत नव्हती . बारा गावाचं पाणी प्यायलेला तिचा मूळ स्वभाव उफाळून आला . लाव्हा उसळला . निखार्यासारखा तिचा चेहरा फुलला होता . नजरेतून ठिणग्या टाकत , तिने शब्दांची आग लावली . " दिलंस काय तू मला ? चार दागिने ... भाड्याचं घर ! तुझ्याहून वरचढ , छप्पन माझ्या पायाशी लोळण घेतात , माझे तळवे चाटतात , माझ्यासमोर कुत्र्यासारखी शेपटी घोळवत , लाळ टपकवत उभे राहतात . माझ्या डोळ्यांच्या एका इशाऱ्यावर लोटांगण घालतात . तुझ्या पेक्षा तरणेबांड रोज माझ्या शेजेवर येतात ........"
.
. . बाळासाहेबाची होळी धडाडून पेटली . आपल्या बाहेरख्यालीपणाचा तिच्याच तोंडून , मोठ्या तोऱ्यात केला गेलेला स्वीकार , समर्थन , त्याच्या जिव्हारी लागलं . शब्दाने शब्द वाढत गेला . आवाज खोलीच्या बाहेर ऐकू येऊ लागले . त्याच्याच जोडीला आदळ आपटीचेही आवाज बाहेर येत होते . लॉज मधल्या , आजूबाजूच्या खोल्यांमधली माणसं धसक्याने बाहेर उभी होती ,नोकरवर्ग जमला होता .संपत बंद दार ठोकत होता . पण कोणीही दार उघडलं नाही . आतून किंकाळ्या , रडणं भेकण ; शिवीगाळ सगळं बाहेर ऐकू येत होतं . मालकाची खोली ! काय करावं कुणाला सुचत नव्हतं. हळूहळू किंकाळ्या थांबल्या . नुसताच , काहीतरी आदळल्याचा आवाज बाहेर येत होता . आणि क्षीण हुंदके ... कण्हण्याचे सुस्कारे .!
.
. , संपतने इतरांच्या मदतीने दार फोडलं . जमिनीवर कुसुम अस्ताव्यस्त पसरली होती . तिच्या छाताडावर बसून , बाळासाहेब तिच्या झिंज्या पकडून , तिचं डोकं जमिनीवर आपटत होता . त्याच्या दुसऱ्या हातात फुटलेली सोड्याची बाटली होती . त्याच्या डोळ्यातून अंगार बरसत होते . सैतानाने त्याचा ताबा घेतला होता . कुसुम मध्ये आता कण्हण्याचे पण त्राण राहिलं नव्हतं . ती निपचित पडली होती , चिंध्यांच्या बाहुली सारखी . .जमिनीवर काचांचा सडा पडला होता . रक्ताचं थारोळ झालं होतं .
.
. . बघ्यांमध्ये एकच हलकल्लोळ माजला . हाहा म्हणता तिथे शुकशुकाट झाला . आपल्याला कसली झळ लागू नये ; पोलिसांचा ससेमिरा सुरु होऊ नये , म्हणून सगळे नाहीसे झाले . तिथे स्मशान शांतता पसरली . पोलीस आले तो पर्यंत संपतने बरेच पुरावे नाहीसे करायची पराकाष्ठा केली होती . शव विच्छेदनात कुसुमचा चेहरा , मान , दोन्ही हात , हातांचे तळवे ,ह्या सर्व निळून त्र्यहात्तर लहान मोठ्या जखमा झाल्या होत्या . सगळ्या धारदार काचे मुळे झालेल्या होत्या .
.
. . कुसुमच्या मग्रुरीचा , तिच्या अर्वाच्य वर्तणुकीचा , तरुण पुरुषांना तिच्याकडे आकृष्ट करून घेणारा तिचा एकमेव आधार , तिचा चेहरा ; तोच बरबाद करायचा निश्चय बाळासाहेबाने केला होता . सर्वात जास्त घाव चेहऱ्यावर होते . स्वतःचा बचाव करण्यासाठी चेहरा झाकताना , तो सांभाळताना , कुसुमच्या हातांवर प्रहार झाले होते . ज्या चेहऱ्याने .. ज्या तिलोत्तमेने बाळासाहेबाला भुरळ घातली होती , जिच्या साठी त्याने आपल्या सामाजिक स्थानाचा , आई वडिलांचा पण विचार केला नव्हता ; " अरे नाचीला कोणी देव्हाऱ्यात बसवतं का ? तिला रखेल ठेव की " अशा व्यवहारी सल्यांना ज्याने धुत्कारलं होतं ; त्याच बाळासाहेबाने राग , क्रोध , अपमान , तिरस्कार अशा भावनांच्या आहारी जाऊन , आपल्या हाताने , आपल्या प्रेमाचा चक्काचूर केला होता .
.
. . आरोपी म्हणून पोलीस त्याला पकडून घेऊन जात होते , तेव्हां त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते . चेहरा पाषाणासारखा थिजला होता .. गारगोटी सारखे डोळे भकास होते , शरीरातील चेतनेची वाताहत झाली होती . उरलं होतं एक शुष्क , विदीर्ण , विवश , निर्माल्य ! मला कळल्यावर खूप हळहळले मी ! एक प्रेमकथा बेचिराख झाली होती . पण कोण काय करू शकणार होतं ? बुडत्याचा पाय खोलातच जाणार होता !#सुरेखामोंडकर
१५/०१/२०१७
समाप्त
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा