शनिवार, २० जानेवारी, २०१८

अनेक प्रश्न ( ललित लेख )

अनेक प्रश्न
.
ह्या वर्षी आमच्या गावात पण मस्त थंडी पडलीय हं ! # माडीवरची मंडळी खाली आली # म्हणजे माळ्यावर टाकलेली गरम कपडयांची ब्याग खाली उतरली ........ जगभर फिरताना .... ह्यांचा आपल्याला काहीही उपयोग नाही .....हे माहित असूनही ....त्यांच्या कलाकृतीचा मोह पडून ....विकत घेतलेले ...छान छान ...स्वेटर्स , हातमोजे , स्कार्फ , टोप्या ...( स्वतःला :) ) ..घालायची संधी मिळाली .
गारव्याचा ऋतू म्हणजे # भटकण्याचा मोसम #
सुट्या पण इतक्या सोयीस्कर मिळाल्या होत्या की ....जातिवंत भटक्यां साठी ....# हातात वाफाळणारा चहाचा कप ..आणि ..साथीला गरमागरम भज्यांची रास .#
थोडक्यात ......दुग्ध शर्करा योग !

आमचं गाव पण खूप छान आहे हं ! सिने दिग्दर्शकांच लाडक गाव .... # महेश मांजरेकर # नी वाखाणलेल ....# टाईमपास # आणि # होणार सून # मुळे ""जगप्रसिद्ध "" झालेलं .
(" ती" एकदा " त्या' घरची सून झाल्या नंतर , आमचं गाव त्या सीरिअल मध्ये दिसत की नाही माहित नाही !आमचा मोहरा कधीच दुसऱ्या चानेल कडे वळला आहे ........वीट आला की वळायच
त्यांनी ठरवलं पकवायचं
तरी आपण थोडंच त्यांना भुलायचं !!!!!!!!!!!!
( अरे ....तिरोळी झाली की ! :) )
कोसळणाऱ्या पावसात ....तापवणाऱ्या उन्हाळ्यात ....जेव्हां बाहेर कुठे जाता येत नाही ....तेव्हां फिरायचं आपल्या गावात ! ह्या थंडीत बाहेर भरपूर भटकतेय !
तर मी काय सांगत होते .......आत्ताच जवळच्या एका रिसोर्ट मध्ये गेले होते छोटे छोटे देखणे बंगले .....जिम .. टेनिस कोर्ट ...पोहण्याचा तलाव ...( काही उपयोग झाला नाही . पाण्यात बोट घालून पाहिलं तर बोटाच लाकूड झालं .उतरले असते तर शरीराचा ओंडका झाला असता ! )...मन प्रसन्न करणारी वनराई !
त्यांच क्लब हाउस पण होत > गावातले बरेच लोक सभासद होते < रोजच्या व्यायामासाठी त्यांचा पण तिथे वावर होता .मी morning walk साठी निघाले असताना एक BMW आली ...कोपऱ्यातल्या कचरापेटी शी थांबली ....पन्नाशीतला एक माणूस खाली उतरला ....डिकी उघडलीन ...गच्च भरलेल्या दोन मोठ्या पिशव्या बाहेर काढल्यान .....सगळ्या बिअर च्या रिकाम्या बाटल्या होत्या . दोन दोन करून त्याने त्या कचरापेटीत टाकल्या ....गाडी parking मध्ये नेवून ठेवली आणि आपली राकेट घेवून तो टेनिस कोर्ट कडे गेला .
मला क्षणभर त्याचं कौतुक वाटलं . स्वच्य्यता अभियानाचा उपयोग झाला असं वाटलं . नंतर लक्षात आल , ...त्याने बाटल्यांवर ची लेबलं काढली नव्हती किवा खरवडून खराब करून ही ठेवली नव्हती .....त्या बाटल्यांचा भेसळयुक्त बिअर विकायला उपयोग केला जाणार नाही ....ह्या साठी आपल्या परीने प्रयत्न करायला हवा होता !
आम्ही जेव्हा आमच्या घरातले जुने डबे , बाटल्या , बरण्या काढतो ,तेव्हा आमचा कचरावाला ते घेवून जातो ....मग ह्यांना का बर इकडे आणून टाकाव्या लागल्या . नंतर कळल ....ते गावातले एक प्रतिष्ठित आहेत ! मग तर मनात अनेक प्रश्न आले .....एक चेहरे पे कयी चेहरे लगा लेते है लोग .......तुमच्याही मनात काही प्रश्न आले असतील !
सुरेखा मोंडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा