#सिनेरंग
.
. . दुसरा आदमी . .
.
. . माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी हा एक आहे . यश चोप्रांच्या १९७७मध्ये आलेल्या ह्या सिनेमात विवाहबाह्य संबंधांवर भाष्य केलेलं आहे . जास्त गुंत्यात न जाता , समाजमान्य मतां समोर जटील , तापदायक प्रश्न उभे न करता केवळ मनोरंजनावर लक्ष केंद्रित केलं आहे . दरीच्या काठावर उभी असणारी व्यक्ती दरीत कोसळली तर एक दुख्खद घटना घडेल , निराळे विचार , भावना आणि परिणाम होतील आणि जर ती सावरली , तिथून परत फिरली तर ; तिथपर्यंत ती ज्या कारणांमुळे पोचली ते व्रण राहतील ; पण हळूहळू ते सुकतील ! त्यावर खपली धरेल ! नवी त्वचा येईल ! कदाचित एक नवीन आयुष्य सुरु होईल .
.
. . हा सिनेमा खोल खाई पर्यंत पोचलेल्या , पण योग्य वेळी तोल सावरून परत फिरलेल्या , दुख्खाने सैरभैर झालेल्या निशाचा ( राखी) आहे . दिग्दर्शक आहेत रमेश तलवार !
.
. . नजरोंसे कहदो , प्यारमें ; मिलनेका मौसम आ गया , अशी एकमेकांबद्दल आतुरता असणारे दोघे ; करण सक्सेना ( ऋषी कपूर ) आणि तिम्सी ( नीतू सिंग ) प्रेमात आकंठ बुडाले होते . दोन्ही कलाकार प्रत्यक्षात पण प्रेमात असल्याने , दोघांची अफलातून केमिस्ट्री जुळलेली आहे . त्यांनी आधीचे प्रेमवेडे आणि नंतर विवाह झाल्यावर कृतार्थ दोघे खूप लोभसपणे व्यक्त केले आहेत .
. ,आंखोमें काजल है
. . काजलमें दिल है
. .चलो दिलमें बिठाके तुम्हें
. . तुमसेही प्यार किया जाय
ह्या एकमेकांना दिलेल्या आणाभाका , त्यांच्या चेहऱ्यावरून आणि देहबोलीतून व्यक्त होतात . बर्फाळ काश्मीरमधील काकडणाऱ्या थंडीत एकमेकांच्या उबेत असणारे ते दोघे . त्यांच्या हनिमूनच्या वेळी खोलीत , टेबलावर साठलेले तीनचार दिवसांचे अन्नपदार्थ आणि बंद दारावर खडूने लिहिलेले ,' Please do not disturb हमें भूख नहीं है ! ह्यातून त्यांचं एकमेकांवर झोकून देऊन केलेलं तारुण्यसुलभ प्रेम कळतंच , पण नंतर कथेला मिळालेल्या कलाटणीमुळे ; दोन प्रेमिकांच्या; घरातल्या सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता केलेल्या लग्नानंतर , एक जोडपं ह्या दृष्टीने आयुष्यात कशी वादळ येतात , त्यांच्या टवटवीत प्रेमाची कशी पानगळ सुरु होते ; हा विरोधाभास आपल्याला भयचकित करतो
.
. . विवाह झाल्यावर , स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी करण एक advertising agency सुरु करतो . तिथे एक designer तो नोकरीवर ठेवतो . अत्यंत देखणी , बुद्धिमान , सौंदर्यदृष्टी आणि कलात्मकता यांचा आकर्षक मिलाफ असणारी निशा ( राखी ) त्याच्या ऑफिसात आणि जीवनात प्रवेश करते . निशा आधीच पोळलेली असते . तिच्या प्रियकराच्या ( शशी कपूर ) अकाली मृत्यूच्या धक्यातून ती अजून सावरलेली नसते .इथे कलाकारांची निवड अत्यंत योग्य केलेली आहे . शशी कपूर आणि ऋषी कपूर ह्यांच्या मधील साम्य कथेच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरलंय .
.
. . करणच्या प्रत्येक हालचालीत निशाला शशी दिसतो . ती त्याच्यात गुंतत जाते . आपल्या अधुऱ्या प्रेम कहाणीची स्वप्नं ती करणच्या सहवासात बघायला लागते . ह्या प्रगल्भ , परिपूर्ण , बुध्धिमान पुरंध्रीच्या प्रेमपाशात करण पूर्णपणे अडकतो .
. . आओ मनाये जश्ने मोहब्बत
. . जाम उठाये , जाम के बाद
.
. . आयुष्यातील आनंदाचे चषक दोघेही बेधुंद होऊन चाखतात . निशाने करणची उष्टी सिगरेट ओढणं , त्याच्या उष्ट्या चषकामधून वारुणीचा स्वाद घेणे ; हे सर्व निशाच्या मित्राला अस्वस्थ करतं ( परीक्षित सहानी ) हे संबंध लपून राहण्यासारखे नसतात आणि कोणाला मान्य होण्यासारखे पण नसतात , करणच्या वैवाहिक आयुष्यात आगडोंब उसळतो . तम्सी पण सहजासहजी हार मानणारी नसते . निशाच्या आयुष्यात उलथापालथ घडते . अपमान , मानहानी , तिरस्कार तिच्या वाट्याला येतो .
.
. . करणच्या गध्ध्ये पंचविशीला हा उतावीळपणा शोभेसा होता पण निशाच्या वयानुरूप आलेल्या प्रगल्भतेला हा उतरणीचा रस्ता कुठे नेणार आहे ते कळत होतं . करण तिच्यावर प्रेम करत असतो पण ती करणवर प्रेम करीत नसते तर त्याच्यात दडलेल्या शशी वर प्रेम करत असते ! करण असतो , ' दुसरा आदमी " शशी नसतोच !
.
. . धुक्याने गच्च भरलेल्या जंगलात , कुणालाही न जुमानता करण तिला पुन्हा पुन्हा साद घालतो , आमंत्रण देतो ,
. . ' क्या मोसम है
. . दो दिवाने दिल
. . ' चल कही और निकल जाये . '
.
. . अत्यंत विचारपूर्वक , अतीव वेदनेने , मनाला लगाम घालून , भावनांना बांध घालून निशाने कठोर निर्णय घेतलेला असतो ,
. . ' अच्छा है संभल जायें '
. . त्याच्या आर्त हाकेकडे अत्यंत उदासपणे दुर्लक्ष करून ती धुक्यात हरवलेल्या वाटेवरून निराशेच्या अंधारात नाहीशी होते .
.
. राखीला उत्कृष्ट अभिनेत्री आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून nomination मिळालं होतं . करण जोहरचा , ' ए दिल है मुश्कील ' हा सिनेमा ह्याच कथानकावर आधारीत आहे . ह्यात रणबीर ( पुन्हा कपूर ! ) ऐश्वर्या आणि अनुष्का यांनी ह्या भूमिका केल्या आहेत . कोणाच्याही मनाला भुरळ घालेल असंच हे कथानक आहे . महाजालात सापडला तर नक्की बघा ! पण जरा सांभाळून , ' दुसरा आदमी ' नावाचा रामसेचा पण एक सिनेमा आहे ! तेव्हां जरा काळजी घ्या !
______________________________________________________ #सुरेखा_मोंडकर
.
. . दुसरा आदमी . .
.
. . माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी हा एक आहे . यश चोप्रांच्या १९७७मध्ये आलेल्या ह्या सिनेमात विवाहबाह्य संबंधांवर भाष्य केलेलं आहे . जास्त गुंत्यात न जाता , समाजमान्य मतां समोर जटील , तापदायक प्रश्न उभे न करता केवळ मनोरंजनावर लक्ष केंद्रित केलं आहे . दरीच्या काठावर उभी असणारी व्यक्ती दरीत कोसळली तर एक दुख्खद घटना घडेल , निराळे विचार , भावना आणि परिणाम होतील आणि जर ती सावरली , तिथून परत फिरली तर ; तिथपर्यंत ती ज्या कारणांमुळे पोचली ते व्रण राहतील ; पण हळूहळू ते सुकतील ! त्यावर खपली धरेल ! नवी त्वचा येईल ! कदाचित एक नवीन आयुष्य सुरु होईल .
.
. . हा सिनेमा खोल खाई पर्यंत पोचलेल्या , पण योग्य वेळी तोल सावरून परत फिरलेल्या , दुख्खाने सैरभैर झालेल्या निशाचा ( राखी) आहे . दिग्दर्शक आहेत रमेश तलवार !
.
. . नजरोंसे कहदो , प्यारमें ; मिलनेका मौसम आ गया , अशी एकमेकांबद्दल आतुरता असणारे दोघे ; करण सक्सेना ( ऋषी कपूर ) आणि तिम्सी ( नीतू सिंग ) प्रेमात आकंठ बुडाले होते . दोन्ही कलाकार प्रत्यक्षात पण प्रेमात असल्याने , दोघांची अफलातून केमिस्ट्री जुळलेली आहे . त्यांनी आधीचे प्रेमवेडे आणि नंतर विवाह झाल्यावर कृतार्थ दोघे खूप लोभसपणे व्यक्त केले आहेत .
. ,आंखोमें काजल है
. . काजलमें दिल है
. .चलो दिलमें बिठाके तुम्हें
. . तुमसेही प्यार किया जाय
ह्या एकमेकांना दिलेल्या आणाभाका , त्यांच्या चेहऱ्यावरून आणि देहबोलीतून व्यक्त होतात . बर्फाळ काश्मीरमधील काकडणाऱ्या थंडीत एकमेकांच्या उबेत असणारे ते दोघे . त्यांच्या हनिमूनच्या वेळी खोलीत , टेबलावर साठलेले तीनचार दिवसांचे अन्नपदार्थ आणि बंद दारावर खडूने लिहिलेले ,' Please do not disturb हमें भूख नहीं है ! ह्यातून त्यांचं एकमेकांवर झोकून देऊन केलेलं तारुण्यसुलभ प्रेम कळतंच , पण नंतर कथेला मिळालेल्या कलाटणीमुळे ; दोन प्रेमिकांच्या; घरातल्या सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता केलेल्या लग्नानंतर , एक जोडपं ह्या दृष्टीने आयुष्यात कशी वादळ येतात , त्यांच्या टवटवीत प्रेमाची कशी पानगळ सुरु होते ; हा विरोधाभास आपल्याला भयचकित करतो
.
. . विवाह झाल्यावर , स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी करण एक advertising agency सुरु करतो . तिथे एक designer तो नोकरीवर ठेवतो . अत्यंत देखणी , बुद्धिमान , सौंदर्यदृष्टी आणि कलात्मकता यांचा आकर्षक मिलाफ असणारी निशा ( राखी ) त्याच्या ऑफिसात आणि जीवनात प्रवेश करते . निशा आधीच पोळलेली असते . तिच्या प्रियकराच्या ( शशी कपूर ) अकाली मृत्यूच्या धक्यातून ती अजून सावरलेली नसते .इथे कलाकारांची निवड अत्यंत योग्य केलेली आहे . शशी कपूर आणि ऋषी कपूर ह्यांच्या मधील साम्य कथेच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरलंय .
.
. . करणच्या प्रत्येक हालचालीत निशाला शशी दिसतो . ती त्याच्यात गुंतत जाते . आपल्या अधुऱ्या प्रेम कहाणीची स्वप्नं ती करणच्या सहवासात बघायला लागते . ह्या प्रगल्भ , परिपूर्ण , बुध्धिमान पुरंध्रीच्या प्रेमपाशात करण पूर्णपणे अडकतो .
. . आओ मनाये जश्ने मोहब्बत
. . जाम उठाये , जाम के बाद
.
. . आयुष्यातील आनंदाचे चषक दोघेही बेधुंद होऊन चाखतात . निशाने करणची उष्टी सिगरेट ओढणं , त्याच्या उष्ट्या चषकामधून वारुणीचा स्वाद घेणे ; हे सर्व निशाच्या मित्राला अस्वस्थ करतं ( परीक्षित सहानी ) हे संबंध लपून राहण्यासारखे नसतात आणि कोणाला मान्य होण्यासारखे पण नसतात , करणच्या वैवाहिक आयुष्यात आगडोंब उसळतो . तम्सी पण सहजासहजी हार मानणारी नसते . निशाच्या आयुष्यात उलथापालथ घडते . अपमान , मानहानी , तिरस्कार तिच्या वाट्याला येतो .
.
. . करणच्या गध्ध्ये पंचविशीला हा उतावीळपणा शोभेसा होता पण निशाच्या वयानुरूप आलेल्या प्रगल्भतेला हा उतरणीचा रस्ता कुठे नेणार आहे ते कळत होतं . करण तिच्यावर प्रेम करत असतो पण ती करणवर प्रेम करीत नसते तर त्याच्यात दडलेल्या शशी वर प्रेम करत असते ! करण असतो , ' दुसरा आदमी " शशी नसतोच !
.
. . धुक्याने गच्च भरलेल्या जंगलात , कुणालाही न जुमानता करण तिला पुन्हा पुन्हा साद घालतो , आमंत्रण देतो ,
. . ' क्या मोसम है
. . दो दिवाने दिल
. . ' चल कही और निकल जाये . '
.
. . अत्यंत विचारपूर्वक , अतीव वेदनेने , मनाला लगाम घालून , भावनांना बांध घालून निशाने कठोर निर्णय घेतलेला असतो ,
. . ' अच्छा है संभल जायें '
. . त्याच्या आर्त हाकेकडे अत्यंत उदासपणे दुर्लक्ष करून ती धुक्यात हरवलेल्या वाटेवरून निराशेच्या अंधारात नाहीशी होते .
.
. राखीला उत्कृष्ट अभिनेत्री आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून nomination मिळालं होतं . करण जोहरचा , ' ए दिल है मुश्कील ' हा सिनेमा ह्याच कथानकावर आधारीत आहे . ह्यात रणबीर ( पुन्हा कपूर ! ) ऐश्वर्या आणि अनुष्का यांनी ह्या भूमिका केल्या आहेत . कोणाच्याही मनाला भुरळ घालेल असंच हे कथानक आहे . महाजालात सापडला तर नक्की बघा ! पण जरा सांभाळून , ' दुसरा आदमी ' नावाचा रामसेचा पण एक सिनेमा आहे ! तेव्हां जरा काळजी घ्या !
______________________________________________________ #सुरेखा_मोंडकर