१९/०२/२०१७
.
.
.
.
.
.
. .#ध्यानीमनी ( मराठी नाटक )
.
. १९८० चं दशक आणि त्याच्या मागचा , पुढचा काही काळ हा मराठी नाटकाचा सुवर्णकाळ होता . जयवंत दळवी , तेंडूलकर , मतकरी यांच्यासारख्या अनेकांच्या नितांत सुंदर कलाकृती आम्ही पाहिल्या . आम्हांला आनंदाचं कोठार फोडून देणाऱ्या सर्व नाटककारांची , कलाकारांची , दिग्दर्शकांची नावं लिहायची म्हटली तर तोच एक भलामोठा लेख होईल . बाल रंगभूमी , प्रायोगिक रंगभूमी , समांतर .. व्यावसायिक ; सगळ्या नाट्य प्रकारांत कमालीचं चैतन्य होतं . नवे नवे प्रयोग केले जात होते आणि त्यांना भरभरून दाद दिली जात होती . मधला काही काळ जरा मरगळलेला गेला . काहीतरी खोगीरभरती होत राहिली . मी तर त्या काळात क्वचितच नाटक पाहायचे . आता पुन्हा नाट्यसृष्टीला नवी पालवी फुटतेय , धुमारे फुटताहेत .
.
. . जुनी गाजलेली नाटकं पुनरुज्जीवीत केली जात आहेत आणि आशयघन नाटकांचे चित्रपट ही होत आहेत . कट्यार काळजात घुसली , नटसम्राट ह्या नाटकांचे सिनेमात रुपांतर केल्यावर त्याला भरभरून यश मिळालं . आता ध्यानीमनी हे नाटक सिनेमा बनून चित्रपटगृहात दाखल झालं आहे . " हा सिनेमा पाहू नका " अशी नकारार्थी जाहिरात केली जात आहे . खरोखरच मी हा सिनेमा पाहणार नाहीये ! अर्थात त्यांच्या जाहिरातीमुळे नाही !
.
. . मी हे नाटक पाहिलं आहे . पंचवीस वर्षांपूर्वी ! लेखक प्रशांत दळवी . तेव्हां नाविन्यपूर्ण नाटकं त्यांनी सादर केली . अत्यंत गाजलेलं ' चारचौघी ' त्यांचंच . दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते महेश मांजरेकर ! या सर्वांनी , मोठ्या धाडसाने हे नाटक उभं केलं होतं . पहिले काही प्रयोग सप्पाटून आपटले , नंतर मात्र नाटक धोधो चाललं .
.
. . शालू आणि सदानंद ह्या जोडप्याचं काम केलं होतं नीना कुलकर्णी आणि शिवाजी साटम यांनी . त्यातील क्लिनिकल सायकोलॉजीस्टचं काम केलं होतं महेश मांजरेकर यांनी . नेपथ्यकार आता आठवत नाही , पण त्यांनी उभारलेला घराचा सेट , अजूनही , जस्साच्या तस्सा माझ्या डोळ्यासमोर उभा आहे .
.
. .मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाचं घर , छोट्या छोट्या वस्तूंनी भरलेलं . थोडसं नीटनेटक , बरचस अस्ताव्यस्त . घरभर पडलेल्या लहान मुलाच्या वस्तू .. त्याची खेळणी , पुस्तकं , कपडे आणि पदर खोचून त्याच्या आईची चाललेली लगबग . घर आवरणं , कपड्यांच्या घड्या करणं , त्यातच , मोहित साठी , त्यांच्या छोट्या मुलासाठी , त्याच्या आवडीचा खाऊ बनवणं . शालूच मातृ हृदय , मुलावरच अपरंपार प्रेम , त्याच्यासाठी चाललेली धावपळ , त्याच्या बद्दल असणारी कळकळ ; नीना कुलकर्णी प्रत्यक्ष ही भूमिका जगल्या होत्या . नंतर एका मुलाखतीत ह्या भूमिकेचा त्यांना येणारा ताण , त्यांनी व्यक्त केला होता असं आठवतंय . आईच्या प्रेमाला आवर घालू पाहणारा , तिला समजून घेणारा , कधी हताश होणारा , कधी समजूत काढणारा , कधी तिला वास्तवात आणू पाहणारा . कधी निराश होणारा , कधी चिडणारा , तर कधी हतबुद्ध होऊन खांदे पाडून तिला बघत बसणारा सदानंद , मोहितचे बाबा , शिवाजी साटम नी ताकदीने अभिनीत केला होता .
.
. . ह्या नाटकाचा परिणाम माझ्या मनावर अत्यंत खोलवर झाला होता . सुन्न होऊन गेले होते . सत्य कळल्यावर थरकाप झाला होता . बसलेला धक्का इतका दूरगामी होता , की काय वाट्टेल ते झालं तरी कोणत्याही मुलाचं नाव ' मोहित ' ठेवणार नाही , असं मी पक्कं केलं होतं . आणि कसं कोण जाणे , इतकं लोभस नाव असूनही ,' मोहित टाकळकर ' खेरीज कोणीही ह्या नावाचं माझ्या परिचयात नाही .
.
. . कथाबिजाचा जीव छोटासा आहे . दोन अंकी नाटकाएवढाच . सिनेमाचा आवाका खूप मोठा असतो . बऱ्याच पद्धतीने कथानक खुलविता येतं . आज मेडिकल सायन्स इतकं प्रगत आहे की नाटकातील समस्येवर अनेक , सहजसाध्य उपाय आहेत . हा सगळा हृदयस्पर्शी कथाभाग कसा खुलवितात हे कौशल्याचं काम आहे . प्रेक्षक आज , त्या समस्येशी कितपत एकरूप होऊ शकतील , हे ही सांगता नाही येणार .
.
. . हे कथानक मनोविश्लेषणात्मक रहस्य प्रधान आहे . आणि असे थ्रिलर मला खूप आवडतात . नाटक पाहिलं तेव्हां मी बरीच तरुण होते तरीही त्यातील ते संवेदनशील नाट्य मी सहन करू शकले नाही . आजही मी पाठकांच ते घर , मोहित आणि त्याचे आई , बाबा विसरू शकत नाही . कधीतरी सुती साडी नेसलेली शालू , मोहितला हाका मारत लगबगीने माझ्या किचन मधून सटकन दुसऱ्या खोलीत जाते . सदानंद तिला समजुतीच्या चार गोष्टी सांगू बघतो आणि हताशपणे गप्पच बसतो . तो ताण आज पुन्हा मी नाही सहन करू शकणार ! मी तर बाबा , हा सिनेमा नाही पाहणार .
.
. . जर नाटक पाह्यचं भाग्य तुम्हांला मिळालं नसलं तर नक्की हा सिनेमा बघा . पुनरुज्जीवीत नाटक रंगभूमीवर येईल म्हणून वाट पाहत बसू नका . नाही आलं तर ? हे ही नाही , ते ही नाही असं होईल . पदरात पडतंय ते पाडून घ्या ! ज्यांनी पूर्वी नाटक पाहिलं आहे त्यांनीही पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायला हरकत नाही .#सुरेखामोंडकर
.
. १९८० चं दशक आणि त्याच्या मागचा , पुढचा काही काळ हा मराठी नाटकाचा सुवर्णकाळ होता . जयवंत दळवी , तेंडूलकर , मतकरी यांच्यासारख्या अनेकांच्या नितांत सुंदर कलाकृती आम्ही पाहिल्या . आम्हांला आनंदाचं कोठार फोडून देणाऱ्या सर्व नाटककारांची , कलाकारांची , दिग्दर्शकांची नावं लिहायची म्हटली तर तोच एक भलामोठा लेख होईल . बाल रंगभूमी , प्रायोगिक रंगभूमी , समांतर .. व्यावसायिक ; सगळ्या नाट्य प्रकारांत कमालीचं चैतन्य होतं . नवे नवे प्रयोग केले जात होते आणि त्यांना भरभरून दाद दिली जात होती . मधला काही काळ जरा मरगळलेला गेला . काहीतरी खोगीरभरती होत राहिली . मी तर त्या काळात क्वचितच नाटक पाहायचे . आता पुन्हा नाट्यसृष्टीला नवी पालवी फुटतेय , धुमारे फुटताहेत .
.
. . जुनी गाजलेली नाटकं पुनरुज्जीवीत केली जात आहेत आणि आशयघन नाटकांचे चित्रपट ही होत आहेत . कट्यार काळजात घुसली , नटसम्राट ह्या नाटकांचे सिनेमात रुपांतर केल्यावर त्याला भरभरून यश मिळालं . आता ध्यानीमनी हे नाटक सिनेमा बनून चित्रपटगृहात दाखल झालं आहे . " हा सिनेमा पाहू नका " अशी नकारार्थी जाहिरात केली जात आहे . खरोखरच मी हा सिनेमा पाहणार नाहीये ! अर्थात त्यांच्या जाहिरातीमुळे नाही !
.
. . मी हे नाटक पाहिलं आहे . पंचवीस वर्षांपूर्वी ! लेखक प्रशांत दळवी . तेव्हां नाविन्यपूर्ण नाटकं त्यांनी सादर केली . अत्यंत गाजलेलं ' चारचौघी ' त्यांचंच . दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते महेश मांजरेकर ! या सर्वांनी , मोठ्या धाडसाने हे नाटक उभं केलं होतं . पहिले काही प्रयोग सप्पाटून आपटले , नंतर मात्र नाटक धोधो चाललं .
.
. . शालू आणि सदानंद ह्या जोडप्याचं काम केलं होतं नीना कुलकर्णी आणि शिवाजी साटम यांनी . त्यातील क्लिनिकल सायकोलॉजीस्टचं काम केलं होतं महेश मांजरेकर यांनी . नेपथ्यकार आता आठवत नाही , पण त्यांनी उभारलेला घराचा सेट , अजूनही , जस्साच्या तस्सा माझ्या डोळ्यासमोर उभा आहे .
.
. .मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाचं घर , छोट्या छोट्या वस्तूंनी भरलेलं . थोडसं नीटनेटक , बरचस अस्ताव्यस्त . घरभर पडलेल्या लहान मुलाच्या वस्तू .. त्याची खेळणी , पुस्तकं , कपडे आणि पदर खोचून त्याच्या आईची चाललेली लगबग . घर आवरणं , कपड्यांच्या घड्या करणं , त्यातच , मोहित साठी , त्यांच्या छोट्या मुलासाठी , त्याच्या आवडीचा खाऊ बनवणं . शालूच मातृ हृदय , मुलावरच अपरंपार प्रेम , त्याच्यासाठी चाललेली धावपळ , त्याच्या बद्दल असणारी कळकळ ; नीना कुलकर्णी प्रत्यक्ष ही भूमिका जगल्या होत्या . नंतर एका मुलाखतीत ह्या भूमिकेचा त्यांना येणारा ताण , त्यांनी व्यक्त केला होता असं आठवतंय . आईच्या प्रेमाला आवर घालू पाहणारा , तिला समजून घेणारा , कधी हताश होणारा , कधी समजूत काढणारा , कधी तिला वास्तवात आणू पाहणारा . कधी निराश होणारा , कधी चिडणारा , तर कधी हतबुद्ध होऊन खांदे पाडून तिला बघत बसणारा सदानंद , मोहितचे बाबा , शिवाजी साटम नी ताकदीने अभिनीत केला होता .
.
. . ह्या नाटकाचा परिणाम माझ्या मनावर अत्यंत खोलवर झाला होता . सुन्न होऊन गेले होते . सत्य कळल्यावर थरकाप झाला होता . बसलेला धक्का इतका दूरगामी होता , की काय वाट्टेल ते झालं तरी कोणत्याही मुलाचं नाव ' मोहित ' ठेवणार नाही , असं मी पक्कं केलं होतं . आणि कसं कोण जाणे , इतकं लोभस नाव असूनही ,' मोहित टाकळकर ' खेरीज कोणीही ह्या नावाचं माझ्या परिचयात नाही .
.
. . कथाबिजाचा जीव छोटासा आहे . दोन अंकी नाटकाएवढाच . सिनेमाचा आवाका खूप मोठा असतो . बऱ्याच पद्धतीने कथानक खुलविता येतं . आज मेडिकल सायन्स इतकं प्रगत आहे की नाटकातील समस्येवर अनेक , सहजसाध्य उपाय आहेत . हा सगळा हृदयस्पर्शी कथाभाग कसा खुलवितात हे कौशल्याचं काम आहे . प्रेक्षक आज , त्या समस्येशी कितपत एकरूप होऊ शकतील , हे ही सांगता नाही येणार .
.
. . हे कथानक मनोविश्लेषणात्मक रहस्य प्रधान आहे . आणि असे थ्रिलर मला खूप आवडतात . नाटक पाहिलं तेव्हां मी बरीच तरुण होते तरीही त्यातील ते संवेदनशील नाट्य मी सहन करू शकले नाही . आजही मी पाठकांच ते घर , मोहित आणि त्याचे आई , बाबा विसरू शकत नाही . कधीतरी सुती साडी नेसलेली शालू , मोहितला हाका मारत लगबगीने माझ्या किचन मधून सटकन दुसऱ्या खोलीत जाते . सदानंद तिला समजुतीच्या चार गोष्टी सांगू बघतो आणि हताशपणे गप्पच बसतो . तो ताण आज पुन्हा मी नाही सहन करू शकणार ! मी तर बाबा , हा सिनेमा नाही पाहणार .
.
. . जर नाटक पाह्यचं भाग्य तुम्हांला मिळालं नसलं तर नक्की हा सिनेमा बघा . पुनरुज्जीवीत नाटक रंगभूमीवर येईल म्हणून वाट पाहत बसू नका . नाही आलं तर ? हे ही नाही , ते ही नाही असं होईल . पदरात पडतंय ते पाडून घ्या ! ज्यांनी पूर्वी नाटक पाहिलं आहे त्यांनीही पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायला हरकत नाही .#सुरेखामोंडकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा