कवितेचा जन्म ( प्राथमिक )
.
.फार फार वर्षांपूर्वी, हजारों वर्षांपूर्वी, प्राचीन काली, तुडूंब भरून दुथडी वाहणाऱ्या नद्या होत्या, घनदाट अरण्यं, फळाफुलांनी लहडलेली जंगले होती
. ह्या नद्यांच्या काठी मनुष्य वस्ती फुलत होती. राज्यं उदयाला येत होती, अस्ताला जात होती, नामशेष होत होती, ऐश्वर्य संपन्न होत होती
.
घनदाट अरण्यांतून ॠषी मुनींचं वास्तव्य होतं. त्यांचे यज्ञ याग, होम हवन चालू असायचं, तपश्चरण -साधना सुरू असायची. गुरूकुलामधून विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. विद्यासंपन्न होऊन आपल्या गुरूचे आणि कुलाचे पांग फेडायचे.
.
कारण परत्वे ॠषी मुनी पौरजनी मिसळायचे , राजे महाराजे पण आश्रमात भेट द्यायचे. असा तो काळ! एकदा वाल्मिकी ॠषी घनगर्द अरण्यातून मार्गक्रमणा करीत होते. त्यांनी एका शिकार्याला क्रौंचपक्षाची शिकार करताना पाहिलं.
.
बाण लागून तडफडणारा , रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, तो मरणोन्मुख, विद्ध पक्षी बघून, दु:खाने कळवळून, रागाने लाल होत, वाल्मिकी गरजले,
.
मा निषाद, प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वती: समा :
यत् क्रौंच मिथुनादेकमवधी काम मोहितं
( हे निषादा, चिरंतन काळ पर्यंत तुला प्रतिष्ठा मिळणार नाही कारण की कामेच्छा झालेल्या क्रौंच जोडप्यामधील एकाला तू ठार केले आहेस.)
.
.इसवी सना पूर्वी, दहा हजार वर्षांपूर्वी #जगातील_पहिली कविता #भारतातील एका #महर्षींच्या_वाल्मिकींच्या मुखातून व्यक्त झाली!
.
असं म्हणतात ते काव्य ऐकून ब्रह्मदेव मुग्ध झाले. प्रगट होऊन त्यांनी वाल्मिकींना #रामायण लिहायला सांगितलं आणि मग रामायण हे अजरामर महाकाव्य निर्माण झालं! ह्या विश्वातील पहिलं महाकाव्य!
.
.फार फार वर्षांपूर्वी, हजारों वर्षांपूर्वी, प्राचीन काली, तुडूंब भरून दुथडी वाहणाऱ्या नद्या होत्या, घनदाट अरण्यं, फळाफुलांनी लहडलेली जंगले होती
. ह्या नद्यांच्या काठी मनुष्य वस्ती फुलत होती. राज्यं उदयाला येत होती, अस्ताला जात होती, नामशेष होत होती, ऐश्वर्य संपन्न होत होती
.
घनदाट अरण्यांतून ॠषी मुनींचं वास्तव्य होतं. त्यांचे यज्ञ याग, होम हवन चालू असायचं, तपश्चरण -साधना सुरू असायची. गुरूकुलामधून विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. विद्यासंपन्न होऊन आपल्या गुरूचे आणि कुलाचे पांग फेडायचे.
.
कारण परत्वे ॠषी मुनी पौरजनी मिसळायचे , राजे महाराजे पण आश्रमात भेट द्यायचे. असा तो काळ! एकदा वाल्मिकी ॠषी घनगर्द अरण्यातून मार्गक्रमणा करीत होते. त्यांनी एका शिकार्याला क्रौंचपक्षाची शिकार करताना पाहिलं.
.
बाण लागून तडफडणारा , रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, तो मरणोन्मुख, विद्ध पक्षी बघून, दु:खाने कळवळून, रागाने लाल होत, वाल्मिकी गरजले,
.
मा निषाद, प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वती: समा :
यत् क्रौंच मिथुनादेकमवधी काम मोहितं
( हे निषादा, चिरंतन काळ पर्यंत तुला प्रतिष्ठा मिळणार नाही कारण की कामेच्छा झालेल्या क्रौंच जोडप्यामधील एकाला तू ठार केले आहेस.)
.
.इसवी सना पूर्वी, दहा हजार वर्षांपूर्वी #जगातील_पहिली कविता #भारतातील एका #महर्षींच्या_वाल्मिकींच्या मुखातून व्यक्त झाली!
.
असं म्हणतात ते काव्य ऐकून ब्रह्मदेव मुग्ध झाले. प्रगट होऊन त्यांनी वाल्मिकींना #रामायण लिहायला सांगितलं आणि मग रामायण हे अजरामर महाकाव्य निर्माण झालं! ह्या विश्वातील पहिलं महाकाव्य!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा