>>>>>>>>>>>>>
चला सुट्टी झाली
<<<<<<<<<<<<<<<
शाळेतील परीक्षा झाल्या झाल्याच ... दुसऱ्या दिवसा पासूनच बालनाट्य सुरु होत होती . मला प्रश्न पडला कधी केल्या असतील ह्यांनी तालमी ... मुलांनी परीक्षा सांभाळून कसा काय वेळ दिला असेल .... पालकांचं पण कौतुक वाटलं ... " सगळेच पालक काही , मुलांना मार्कांच्या मागे दौडवत नाहीत .... त्यांच्या कलागुणांना अग्रक्रम देणारेही पालक आहेत तर ! " ... घरातल्या बच्चेकंपनी ला घेऊन नाटकाला गेले . नाटक कसलं ... छोट्या छोट्या ४० /४५ मिनिटांच्या .... कसलाही आगा पिछा नसणाऱ्या ....भरपूर धांगडधिंगा असणाऱ्या ...तीन गोष्टी होत्या ..... सादर करणारी मोठी मुल , ह्या छोट्यांना सांभाळून घेऊन वेळ मारून नेत होती .
माझी मुलं लहान होती तेव्हां ह्याच रंगायतन मध्ये आम्ही दरवर्षी ...सबंध सुट्टीभर धमाल नाटकं बघायचो ... सुधा करमरकर ... रत्नाकर मतकरी ... सुलभा देशपांडे .... एकाहुन एक ...बाल रंगभूमीला वाहून घेतलेले लेखक ...दिग्दर्शक ...कलाकार होते ....मधुमंजीरी...हिमगौरी आणि सात बुटके ... अलिबाबा आणि चाळीस चोर ... दुर्गा झाली गौरी .... एकापेक्षा एक सरस नाटके .... जागा संपेल , पण यादी नाही संपणार ..... मुद्दामहून, खास मुलांसाठी लिहिलेली नाटके ... डोळे खिळवून ठेवणारे सर्वांग सुंदर नेपथ्य ... कलात्मक , सुयोग्य पोशाख ...चोख , दर्जेदार अभिनय .... ह्याच " बाल रंगभूमी " तून आजचे किती तरी अभिनयपटू तावून सुलाखून झळाळत्या सोन्याचे तेज घेऊन बाहेर पडले .
बच्चेकंपनी ने पाहिली नाटकं ... " आवडली " असं पण म्हणाली .... पण मला वाटतं कदाचित त्यांना ते मध्यंतरात मिळणारं आईसक्रिम ...वडे ..सामोसे .. फ्रुटी ... हेच जास्त आवडलं असेल .... अरे तुम्ही कुठे पाहिला आहे बाल रंगभूमीचा सुवर्ण काळ ... बाल नाट्य म्हणजे काय असतं ते तुम्हाला काय कळणार आहे ... आता जे हिणकस समोर दिसतंय त्यालाच तुम्ही छान म्हणणार !!!!
मुलांवर खूप प्रेम करणारे ... त्यांना अभिरुचीसंपन्न बनवणारे ...त्यांना कलेची ओळख करून देणारे ...पदरमोड करून ...लाभाची अपेक्षा न ठेवता बालाना , भरभरून देणारे तसे किमयागार पुन्हा जन्मतील का ... बाल रंगभूमीचा तो रत्नजडीत काल पुन्हा येईल का ...की त्या आधीच ... त्या सर्वांग सुंदरतेची चव घेण्या आधीच ....ही आजची मुलं ..प्रौढ आणि त्या नंतर म्हातारी होऊन जातील ~~~~~~~~ !!!!!!!!!!!
सुरेखा मोंडकर
२६/०४/२०१५
#एक_तारा_निखळला
.
#सुधा_करमरकर
.
२०१५मध्ये लिहिलेली ही वरील पोस्ट !.बालनाट्याकडे होणारं अक्षम्य दुर्लक्ष , त्याची होणारी हेळसांड , मला व्यथित करते . कारण बाल रंगभूमीचा सुवर्ण काळ मी पाहिला आहे . अनुभवला आहे . त्या नाटकांनी माझ्या मुलांचं बाल्य झळाळून टाकलं . त्यांना अभिरुची संपन्न केलं . सुधाताई गेल्या आणि आतड्याला पीळ पडला . पोटातून , अंतरात्म्यातून दु:ख उफाळून आलं . बालनाट्याच्या इतिहासात त्यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं .
तात्यासाहेब आमोणकरांची ही कन्या . नाट्यसृष्टी घरातच मुक्कामाला होती . वडिलांमुळे 'साहित्य संघाच्या ' नाटकांत , लहानपणापासून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका केल्या . नृत्यात पारंगत झाल्या . रीतसर नाट्यशिक्षण घेण्यासाठी त्या अमेरिकेला गेल्या . तिथे त्यांची बाल रंगभूमीशी ओळख झाली आणि मराठी नाट्याचा इतिहासच बदलला .भारतात परत आल्यावर त्यांनी बालनाट्य चळवळच सुरु केली . स्वतःचे एक वेगळे , वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्याला मिळालं . बालनाट्याच्या त्या जन्मदात्या आहेत .
.
रत्नाकर मतकरींसारख्या ताकदीच्या लेखकाने बालनाट्य लिहिलं आणि १९५९मध्ये खरंखुरं बाल नाट्य रंगभूमीवर आलं . " मधुमंजिरी " ! दिग्दर्शन , निर्मिती त्यांची होती . त्यात त्यांनी चेटकिणीची भूमिका केली होती ." लिटल थिएटर " निर्माण झालं होतं .आणि मग बाल गोपाळांची चंगळ झाली . चिनी बदाम , अलिबाबा आणि चाळीस चोर , जादूचा वेल , अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा .. एकसे एक सरस नाटकं रंगभूमीवर आली .मुलं आणि पालक मे महिन्याच्या सुट्टीची आतुरतेने वाट बघायचे , ह्या वर्षी कोणते नवे नाटक मुलांना बघायला मिळणार ही उत्सुकता असायची .मोठ्यांच्या नाटकाच्या तोडीस तोड असणारं खास मुलांचं नाटक . आवडती गोष्ट , अभिनय निपुण कलाकार , भरजरी, खास मेहनत घेऊन तयार केलेलं नेपथ्य .मुलं खुश असायची .
.
सुधाताईच्या आधी पण बाल नाट्य होती . आम्ही पण लहानपणी , दोरीने चादरी बांधून , खोट्या मिशा आणि गंगावनं लावून नाटकं करीत होतो . पण सुधाताईनी बालांना खास दर्जा दिला . बाल नाट्य म्हणजे फक्त लहान मुलांना घेऊन केलेलं नाटक एवढंच नव्हे ,हे त्यांनी जाणलं ..बालांचं एक वेगळे विश्व असते , त्यांच्या कल्पना , त्यांची स्वप्नं एवढंच काय त्यांचं वास्तव पण वेगळेच असते , हे प्रथम त्यांनी जाणलं . पदरमोड केली . अफाट मेहनत केली . आपल्या सर्व निष्ठा , मेहनत , श्रम त्यांनी बाल रंगभूमीला वाहिले .त्यांच्या नाटकात काम केलेली अनेक बालकं पुढे मोठे अभिनेते बनले . भक्ती बर्वे सारख्या कलाकारांनी तर अभिनयावरच शिलालेखा प्रमाणे आपलं नाव कोरून ठेवलं .
त्यांनी , पुत्रकामेष्टी , पती गेले गं काठेवाडी , वीज म्हणाली धरतीला , अश्रूंची झाली फुले , रायगडला जेव्हां जाग येते .. अशा अनेक नाटकांतून व्यक्तिरेखा साकार केल्या . त्यातील 'पुत्रकामेष्टी 'तर काळाच्या पुढे असणारं नाटक! . . अत्यंत देखणी , राजस , अभिनय निपुण , नाट्यवेडी अभिनेत्री . त्या आज जगात नसल्या
.तरी माझ्या आणि माझ्या मुलांच्या मनात कायम राहणार आहेत .
.
रंगभूमीच्या समृद्ध कालखंडात पण बाल रंगभूमी वाळीतच पडलेली होती . आज तर व्यावसायिक , नफ्यातोट्याच्या गणितात ही नाटकं बसतच नाहीत . पुन्हा एखादी सुधा करमरकर जन्म घेईल का , की जी बालविश्वाला नफ्यातोट्याच्या तराजूत तोलणार नाही ? मग कदाचित माझ्या नातवंडांच्या मुलांना , माझ्या पतवंडाना तृप्त करणारी नाटकं पुन्हा नव्याने रंगभूमीत जान निर्माण करतील .#सुरेखामोंडकर .७\२\२०१८
..
शाळेतील परीक्षा झाल्या झाल्याच ... दुसऱ्या दिवसा पासूनच बालनाट्य सुरु होत होती . मला प्रश्न पडला कधी केल्या असतील ह्यांनी तालमी ... मुलांनी परीक्षा सांभाळून कसा काय वेळ दिला असेल .... पालकांचं पण कौतुक वाटलं ... " सगळेच पालक काही , मुलांना मार्कांच्या मागे दौडवत नाहीत .... त्यांच्या कलागुणांना अग्रक्रम देणारेही पालक आहेत तर ! " ... घरातल्या बच्चेकंपनी ला घेऊन नाटकाला गेले . नाटक कसलं ... छोट्या छोट्या ४० /४५ मिनिटांच्या .... कसलाही आगा पिछा नसणाऱ्या ....भरपूर धांगडधिंगा असणाऱ्या ...तीन गोष्टी होत्या ..... सादर करणारी मोठी मुल , ह्या छोट्यांना सांभाळून घेऊन वेळ मारून नेत होती .
माझी मुलं लहान होती तेव्हां ह्याच रंगायतन मध्ये आम्ही दरवर्षी ...सबंध सुट्टीभर धमाल नाटकं बघायचो ... सुधा करमरकर ... रत्नाकर मतकरी ... सुलभा देशपांडे .... एकाहुन एक ...बाल रंगभूमीला वाहून घेतलेले लेखक ...दिग्दर्शक ...कलाकार होते ....मधुमंजीरी...हिमगौरी आणि सात बुटके ... अलिबाबा आणि चाळीस चोर ... दुर्गा झाली गौरी .... एकापेक्षा एक सरस नाटके .... जागा संपेल , पण यादी नाही संपणार ..... मुद्दामहून, खास मुलांसाठी लिहिलेली नाटके ... डोळे खिळवून ठेवणारे सर्वांग सुंदर नेपथ्य ... कलात्मक , सुयोग्य पोशाख ...चोख , दर्जेदार अभिनय .... ह्याच " बाल रंगभूमी " तून आजचे किती तरी अभिनयपटू तावून सुलाखून झळाळत्या सोन्याचे तेज घेऊन बाहेर पडले .
बच्चेकंपनी ने पाहिली नाटकं ... " आवडली " असं पण म्हणाली .... पण मला वाटतं कदाचित त्यांना ते मध्यंतरात मिळणारं आईसक्रिम ...वडे ..सामोसे .. फ्रुटी ... हेच जास्त आवडलं असेल .... अरे तुम्ही कुठे पाहिला आहे बाल रंगभूमीचा सुवर्ण काळ ... बाल नाट्य म्हणजे काय असतं ते तुम्हाला काय कळणार आहे ... आता जे हिणकस समोर दिसतंय त्यालाच तुम्ही छान म्हणणार !!!!
मुलांवर खूप प्रेम करणारे ... त्यांना अभिरुचीसंपन्न बनवणारे ...त्यांना कलेची ओळख करून देणारे ...पदरमोड करून ...लाभाची अपेक्षा न ठेवता बालाना , भरभरून देणारे तसे किमयागार पुन्हा जन्मतील का ... बाल रंगभूमीचा तो रत्नजडीत काल पुन्हा येईल का ...की त्या आधीच ... त्या सर्वांग सुंदरतेची चव घेण्या आधीच ....ही आजची मुलं ..प्रौढ आणि त्या नंतर म्हातारी होऊन जातील ~~~~~~~~ !!!!!!!!!!!
सुरेखा मोंडकर
२६/०४/२०१५
#एक_तारा_निखळला
.
#सुधा_करमरकर
.
२०१५मध्ये लिहिलेली ही वरील पोस्ट !.बालनाट्याकडे होणारं अक्षम्य दुर्लक्ष , त्याची होणारी हेळसांड , मला व्यथित करते . कारण बाल रंगभूमीचा सुवर्ण काळ मी पाहिला आहे . अनुभवला आहे . त्या नाटकांनी माझ्या मुलांचं बाल्य झळाळून टाकलं . त्यांना अभिरुची संपन्न केलं . सुधाताई गेल्या आणि आतड्याला पीळ पडला . पोटातून , अंतरात्म्यातून दु:ख उफाळून आलं . बालनाट्याच्या इतिहासात त्यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं .
तात्यासाहेब आमोणकरांची ही कन्या . नाट्यसृष्टी घरातच मुक्कामाला होती . वडिलांमुळे 'साहित्य संघाच्या ' नाटकांत , लहानपणापासून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका केल्या . नृत्यात पारंगत झाल्या . रीतसर नाट्यशिक्षण घेण्यासाठी त्या अमेरिकेला गेल्या . तिथे त्यांची बाल रंगभूमीशी ओळख झाली आणि मराठी नाट्याचा इतिहासच बदलला .भारतात परत आल्यावर त्यांनी बालनाट्य चळवळच सुरु केली . स्वतःचे एक वेगळे , वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्याला मिळालं . बालनाट्याच्या त्या जन्मदात्या आहेत .
.
रत्नाकर मतकरींसारख्या ताकदीच्या लेखकाने बालनाट्य लिहिलं आणि १९५९मध्ये खरंखुरं बाल नाट्य रंगभूमीवर आलं . " मधुमंजिरी " ! दिग्दर्शन , निर्मिती त्यांची होती . त्यात त्यांनी चेटकिणीची भूमिका केली होती ." लिटल थिएटर " निर्माण झालं होतं .आणि मग बाल गोपाळांची चंगळ झाली . चिनी बदाम , अलिबाबा आणि चाळीस चोर , जादूचा वेल , अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा .. एकसे एक सरस नाटकं रंगभूमीवर आली .मुलं आणि पालक मे महिन्याच्या सुट्टीची आतुरतेने वाट बघायचे , ह्या वर्षी कोणते नवे नाटक मुलांना बघायला मिळणार ही उत्सुकता असायची .मोठ्यांच्या नाटकाच्या तोडीस तोड असणारं खास मुलांचं नाटक . आवडती गोष्ट , अभिनय निपुण कलाकार , भरजरी, खास मेहनत घेऊन तयार केलेलं नेपथ्य .मुलं खुश असायची .
.
सुधाताईच्या आधी पण बाल नाट्य होती . आम्ही पण लहानपणी , दोरीने चादरी बांधून , खोट्या मिशा आणि गंगावनं लावून नाटकं करीत होतो . पण सुधाताईनी बालांना खास दर्जा दिला . बाल नाट्य म्हणजे फक्त लहान मुलांना घेऊन केलेलं नाटक एवढंच नव्हे ,हे त्यांनी जाणलं ..बालांचं एक वेगळे विश्व असते , त्यांच्या कल्पना , त्यांची स्वप्नं एवढंच काय त्यांचं वास्तव पण वेगळेच असते , हे प्रथम त्यांनी जाणलं . पदरमोड केली . अफाट मेहनत केली . आपल्या सर्व निष्ठा , मेहनत , श्रम त्यांनी बाल रंगभूमीला वाहिले .त्यांच्या नाटकात काम केलेली अनेक बालकं पुढे मोठे अभिनेते बनले . भक्ती बर्वे सारख्या कलाकारांनी तर अभिनयावरच शिलालेखा प्रमाणे आपलं नाव कोरून ठेवलं .
त्यांनी , पुत्रकामेष्टी , पती गेले गं काठेवाडी , वीज म्हणाली धरतीला , अश्रूंची झाली फुले , रायगडला जेव्हां जाग येते .. अशा अनेक नाटकांतून व्यक्तिरेखा साकार केल्या . त्यातील 'पुत्रकामेष्टी 'तर काळाच्या पुढे असणारं नाटक! . . अत्यंत देखणी , राजस , अभिनय निपुण , नाट्यवेडी अभिनेत्री . त्या आज जगात नसल्या
.तरी माझ्या आणि माझ्या मुलांच्या मनात कायम राहणार आहेत .
.
रंगभूमीच्या समृद्ध कालखंडात पण बाल रंगभूमी वाळीतच पडलेली होती . आज तर व्यावसायिक , नफ्यातोट्याच्या गणितात ही नाटकं बसतच नाहीत . पुन्हा एखादी सुधा करमरकर जन्म घेईल का , की जी बालविश्वाला नफ्यातोट्याच्या तराजूत तोलणार नाही ? मग कदाचित माझ्या नातवंडांच्या मुलांना , माझ्या पतवंडाना तृप्त करणारी नाटकं पुन्हा नव्याने रंगभूमीत जान निर्माण करतील .#सुरेखामोंडकर .७\२\२०१८
..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा