........ ...... दुविधा ...............................
.
. ज्यांनी " दुविधा " पाहिला , त्यांचं खूप खूप अभिनंदन . त्यांची सहनशक्ती अपरंपार आहे ; ह्या बद्दल त्यांना काहीतरी मोठ्ठ बक्षीस दिलं पाहिजे . मी पण संपूर्ण पाहिला बरं का ! आणि तो सुध्धा तिसऱ्यांदा . तेव्हां बक्षीस देताना माझाही विचार केला जावा ! ( ही नम्र विनंती )
.
. खूप वेळ पडद्यावर अंधार , कावळा , चिमणी , कबूतर , जुनाट अती प्रचंड मातीचे वाडे , वृक्षहीन माळरान , अंगावर येणारी शांतता , संभाषण अपवादानेच , डोकं फिरेल इतका वेळ रातकिड्यांचा आवाज , आता हा सूर्य बुडणार आहे की नाही ; अशी काळजी वाटेल , इतका ताणलेला सूर्यास्त ....हे सर्व असून सुद्धा च्यानेल न बदलता जे निष्ठेने बघत राहिले त्यांच्या लक्षात आलं असेल ," सब्र का फल मीठा होता है ! "
.
. . ह्या सिनेमाने आपल्या पर्यंत मनुष्य स्वभावाचे कंगोरे इतके समर्थपणे पोचवले आहेत की आपण अवाक होऊन जातो . १९७३मध्ये आलेल्या ह्या सिनेमाने त्यावेळी अनेक पारितोषिके मिळवली . खूप गाजला . विजयदन देठा यांच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे . ही एक लोककथा आहे . जोधपूर जवळच्या एका खऱ्याखुऱ्या खेड्यात चित्रण झालं आहे . राजस्थानी लोक संगिताची साथ देण्यात आली आहे . दिग्दर्शक आहेत , मणी कौल !
.
. . एका नवविवाहित जोडप्याची ही कथा आहे . रवी मेनन आणि रईजा पदमसी यांनी ह्या भूमिका केल्या आहेत , त्या दोघांचा आणि सासरा झालेल्या अभिनेत्याचा अभिनय अप्रतिम . त्यांची एकएक हालचाल डोळे खिळवून ठेवते .
घरचा मोठा व्यापार असतो . बापाने मुलाला दुरदेशीचा व्यापार सांभाळण्यासाठी एका विशिष्ट मुहूर्तावर जाण्याची आज्ञा केलेली असते . लग्नाच्या पहिल्या रात्री , बायकोला जवळ घेण्याच्या ऐवजी तो मुलगा तिला उपदेशाचे डोस पाजतो ,पाच वर्षं हाहा म्हणता जातील , ह्याची आशा देतो , आपली वळकटी बांधतो आणि पहाटे , पाच वर्षांसाठी दूरदेशी निघून जातो . त्या सुंदरीच्या प्रेमात पडलेलं आणि कौटुंबिक वातावरण अनुभवायची तीव्र इछ्या असणार एक भूत त्या नवऱ्याच हुबेहूब रूप घेऊन त्या वाड्यात येतं . आणि मग सुरु होते प्रत्येक पावलावर " दुविधा " ; dwidha मनस्थिती ! त्या प्रत्येक वेळेला मानवतेवर , माणुसकीवर , न्यायावर ; स्वार्थ विजय मिळवतो .
.
. . भूत सगळं सत्य आधीच सांगत , तरीदेखील शरीरसुख आणि वैवाहिक आयुष्य ह्याचा मोह पडून गप्प बसणारी पत्नी ! मुलाचं दुरादेश्याहून पत्र येत असूनही ते दडपून , भूता कडून रोज मिळणाऱ्या पाच मोहरांची लालच भारी पडलेला बाप ! मुलगा परत आल्यावर , इज्जत , इतर अनेक फायदे ह्यांच्या गळाला अडकून सख्या मुलाला नाकारणारे आईबाप ! नंतर एका धनगराने खरा मुलगा ओळखण्यासाठी केलेली युक्ती ! खऱ्या मुलाने अभिमानाने , ऐटीत घरी परत आल्यावर भूता पासून झालेल्या बाळा सहित केलेला पत्नीचा स्वीकार ... सगळंच चक्रावून टाकणारं ; अद्भुत ! नऊ रिळांच्या , ह्या सिनेमाचा क्यानवास खूप मोठा आहे . सबंध मानव जातीचा !
.
. . ह्या कथेने भल्या भल्यांना मोह घातला . २००५मध्ये , अमोल पालेकर यांनी ; राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांना घेवून , " पहेली " चित्रीत केला . तो देखील गाजला ! दोन्ही सिनेमा बघण्यासारखे आहेत . दुविधा पाहिल्यावर माझी पण इच्छा चाळवली गेली आहे . आता वेळ मिळाल्यावर मी पहेली पाहणार ...दुसऱ्यांदा ! यूट्यूब वर दोन्ही सिनेमा आहेत .
.
.
. ज्यांनी " दुविधा " पाहिला , त्यांचं खूप खूप अभिनंदन . त्यांची सहनशक्ती अपरंपार आहे ; ह्या बद्दल त्यांना काहीतरी मोठ्ठ बक्षीस दिलं पाहिजे . मी पण संपूर्ण पाहिला बरं का ! आणि तो सुध्धा तिसऱ्यांदा . तेव्हां बक्षीस देताना माझाही विचार केला जावा ! ( ही नम्र विनंती )
.
. खूप वेळ पडद्यावर अंधार , कावळा , चिमणी , कबूतर , जुनाट अती प्रचंड मातीचे वाडे , वृक्षहीन माळरान , अंगावर येणारी शांतता , संभाषण अपवादानेच , डोकं फिरेल इतका वेळ रातकिड्यांचा आवाज , आता हा सूर्य बुडणार आहे की नाही ; अशी काळजी वाटेल , इतका ताणलेला सूर्यास्त ....हे सर्व असून सुद्धा च्यानेल न बदलता जे निष्ठेने बघत राहिले त्यांच्या लक्षात आलं असेल ," सब्र का फल मीठा होता है ! "
.
. . ह्या सिनेमाने आपल्या पर्यंत मनुष्य स्वभावाचे कंगोरे इतके समर्थपणे पोचवले आहेत की आपण अवाक होऊन जातो . १९७३मध्ये आलेल्या ह्या सिनेमाने त्यावेळी अनेक पारितोषिके मिळवली . खूप गाजला . विजयदन देठा यांच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे . ही एक लोककथा आहे . जोधपूर जवळच्या एका खऱ्याखुऱ्या खेड्यात चित्रण झालं आहे . राजस्थानी लोक संगिताची साथ देण्यात आली आहे . दिग्दर्शक आहेत , मणी कौल !
.
. . एका नवविवाहित जोडप्याची ही कथा आहे . रवी मेनन आणि रईजा पदमसी यांनी ह्या भूमिका केल्या आहेत , त्या दोघांचा आणि सासरा झालेल्या अभिनेत्याचा अभिनय अप्रतिम . त्यांची एकएक हालचाल डोळे खिळवून ठेवते .
घरचा मोठा व्यापार असतो . बापाने मुलाला दुरदेशीचा व्यापार सांभाळण्यासाठी एका विशिष्ट मुहूर्तावर जाण्याची आज्ञा केलेली असते . लग्नाच्या पहिल्या रात्री , बायकोला जवळ घेण्याच्या ऐवजी तो मुलगा तिला उपदेशाचे डोस पाजतो ,पाच वर्षं हाहा म्हणता जातील , ह्याची आशा देतो , आपली वळकटी बांधतो आणि पहाटे , पाच वर्षांसाठी दूरदेशी निघून जातो . त्या सुंदरीच्या प्रेमात पडलेलं आणि कौटुंबिक वातावरण अनुभवायची तीव्र इछ्या असणार एक भूत त्या नवऱ्याच हुबेहूब रूप घेऊन त्या वाड्यात येतं . आणि मग सुरु होते प्रत्येक पावलावर " दुविधा " ; dwidha मनस्थिती ! त्या प्रत्येक वेळेला मानवतेवर , माणुसकीवर , न्यायावर ; स्वार्थ विजय मिळवतो .
.
. . भूत सगळं सत्य आधीच सांगत , तरीदेखील शरीरसुख आणि वैवाहिक आयुष्य ह्याचा मोह पडून गप्प बसणारी पत्नी ! मुलाचं दुरादेश्याहून पत्र येत असूनही ते दडपून , भूता कडून रोज मिळणाऱ्या पाच मोहरांची लालच भारी पडलेला बाप ! मुलगा परत आल्यावर , इज्जत , इतर अनेक फायदे ह्यांच्या गळाला अडकून सख्या मुलाला नाकारणारे आईबाप ! नंतर एका धनगराने खरा मुलगा ओळखण्यासाठी केलेली युक्ती ! खऱ्या मुलाने अभिमानाने , ऐटीत घरी परत आल्यावर भूता पासून झालेल्या बाळा सहित केलेला पत्नीचा स्वीकार ... सगळंच चक्रावून टाकणारं ; अद्भुत ! नऊ रिळांच्या , ह्या सिनेमाचा क्यानवास खूप मोठा आहे . सबंध मानव जातीचा !
.
. . ह्या कथेने भल्या भल्यांना मोह घातला . २००५मध्ये , अमोल पालेकर यांनी ; राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांना घेवून , " पहेली " चित्रीत केला . तो देखील गाजला ! दोन्ही सिनेमा बघण्यासारखे आहेत . दुविधा पाहिल्यावर माझी पण इच्छा चाळवली गेली आहे . आता वेळ मिळाल्यावर मी पहेली पाहणार ...दुसऱ्यांदा ! यूट्यूब वर दोन्ही सिनेमा आहेत .
.