सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

कवितेचा जन्म ( प्राथमिक )

कवितेचा  जन्म  ( प्राथमिक )
.
.फार फार वर्षांपूर्वी, हजारों वर्षांपूर्वी, प्राचीन काली, तुडूंब भरून दुथडी वाहणाऱ्या नद्या होत्या, घनदाट अरण्यं, फळाफुलांनी लहडलेली जंगले होती
. ह्या नद्यांच्या काठी मनुष्य वस्ती फुलत होती. राज्यं उदयाला येत होती, अस्ताला जात होती, नामशेष होत होती, ऐश्वर्य संपन्न होत होती
.
घनदाट अरण्यांतून ॠषी मुनींचं वास्तव्य होतं. त्यांचे यज्ञ याग, होम हवन चालू असायचं, तपश्चरण -साधना सुरू असायची. गुरूकुलामधून विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. विद्यासंपन्न होऊन आपल्या गुरूचे आणि कुलाचे पांग फेडायचे.
.
कारण परत्वे ॠषी मुनी पौरजनी मिसळायचे , राजे महाराजे पण आश्रमात भेट द्यायचे. असा तो काळ! एकदा वाल्मिकी ॠषी घनगर्द अरण्यातून मार्गक्रमणा करीत होते. त्यांनी एका शिकार्याला क्रौंचपक्षाची शिकार करताना पाहिलं.
.
बाण लागून तडफडणारा , रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, तो मरणोन्मुख, विद्ध पक्षी बघून, दु:खाने कळवळून, रागाने लाल होत, वाल्मिकी गरजले,
.
मा निषाद, प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वती: समा :
यत् क्रौंच मिथुनादेकमवधी काम मोहितं
( हे निषादा, चिरंतन काळ पर्यंत तुला प्रतिष्ठा मिळणार नाही कारण की कामेच्छा झालेल्या क्रौंच जोडप्यामधील एकाला तू ठार केले आहेस.)
.
.इसवी सना पूर्वी, दहा हजार वर्षांपूर्वी #जगातील_पहिली कविता #भारतातील एका #महर्षींच्या_वाल्मिकींच्या मुखातून व्यक्त झाली!
.
असं म्हणतात ते काव्य ऐकून ब्रह्मदेव मुग्ध झाले. प्रगट होऊन त्यांनी वाल्मिकींना #रामायण लिहायला सांगितलं आणि मग रामायण हे अजरामर महाकाव्य निर्माण झालं! ह्या विश्वातील पहिलं महाकाव्य!

कवितेचा जन्म ( ३ )

कवितेचा  जन्म  ( ३ )
.
.
कविता हा असा प्रांत आहे की , आवडो न आवडो तिचा उल्लेख नेहमीच होत राहतो . प्राचीनकाळी कवींना राजाश्रय असे . कालिदासा सारखे अनेक कवी राजदरबारी असत . राजाश्रयामुळे त्यांच्या चरितार्थाची सोय व्हायची आणि काव्य निर्मितीला त्यांना स्वस्थता लाभायची . तेव्हांही आणि आताही केवळ लेखनावर उचित अर्थार्जन अशक्यच . लेखन हा एक हौसेचा भाग होता आणि आहे . पैसे मिळवण्यासाठी काहीतरी निराळा उद्योग , धंदा करावा लागतो .
.
मोंगल बदशाहानी , राजस्थानातील राजांनी प्रतिभावान कवींना पदरी ठेवलं होतं . त्यांना भाट , चारण असं ही म्हटलं जायचं . हे कवी प्रामुख्याने आपल्या आश्रयदात्याच्या स्तुतीपर गीत रचायचे . त्यांना मानाचं स्थान होतं . राजे जेव्हां मोहिमेवर निघायचे तेव्हां वीर रसयुक्त , शौर्याला पोषक अशी गीतं गात हे भाट , चारण सैन्याच्या सर्वात पुढे असत . पण हळूहळू ह्या आश्रित कवींचं लांगुलचालन इतकं वाढलं की भाटगिरी करणं हा एक वाकप्रचारच तयार झाला . थोडक्यात मस्का मारणं .
.
तरी देखील अनेक राज कवींनी आपल्या प्रतिभेने काव्य सृष्टीत मानाचं स्थान मिळवलं . बडोदा संस्थानाने अनेक कवींना राजाश्रय दिला . यशवंत दिनकर पेंढारकर ( कवी यशवंत ) , भा . रा . तांबे , चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे हे राजकवी होते . गोपाळ नरहर नातू ( कवी मनमोहन ) यांनी मात्र स्वतःला राजकवी म्हणवून घेण्या पेक्षा लोककवी म्हणवून घेणे अधिक पसंत केलं .
.
कविता म्हणजे गागरमें सागर ! थोड्या शब्दात बरंच काही आपल्याला सांगून जाते . काही शब्दात जीवनाचं सार सांगते . आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन तयार करते . .प्रेरणा देते . कविता हा आपल्या भावविश्वाचा आधार असतो . अनुभव कवीचा असतो , पण त्याचं व्यक्तीकरण , काव्यरूप स्थलकालातीत असतं . म्हणूनच कधीही डफोडील ची फुले पाहिलेली नसली तरी ती कविता आपल्याला आवडते . कवी डाफोडील्स ची कुरणं आपल्या डोळ्यासमोर फुलवतो .
.
तरी देखील आजतागायत कवी हा टवाळकीचा विषय झाला आहे " जे न देखे रवी ,ते देखे कवी , ' असं अभिमानाने म्हणायचं ! प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे ' असं त्याचं कौतुक करायचं ! त्याच्या कवितांना , ' सृजनशील आत्म्याचा उच्चार ' म्हणायचं ! ' भावनांचा उत्स्फूर्त आणि उत्कट आविष्कार म्हणजे कविता ' असं मानायचं आणि त्याच कवीला कवडा म्हणायचं , त्याची टर उडवायची ; हे परंपरेने चालत आलंय .
.
नारायण मुरलीधर गुप्ते , ( कवी बी , १८७२ /१९४७ ) हे आधीपण कविता करत होते , पण त्यांची ' ट ला ट , री ला री | जन म्हणती काव्य करणारी " ही कविता प्रसिद्ध झाली आणि त्यांना अभूतपूर्व अशी प्रसिद्धी मिळाली . म्हणजे काय जे स्वतः काव्य करीत होते त्यांनी पण कवींची खिल्ली उडवली आहे .
.
राम गणेश गडकरी ! कवी , नाटककार , विनोदी लेखक ! बाळकराम ह्या नावाने ते विनोदी लेखन करायचे . " कवीचा कारखाना " ह्या आपल्या विनोदी लेखात , त्यांनी कवींची विनोदी दृष्टीकोनातून मांडणी केली आहे . आपली कविता छंदोबद्ध , वृत्तबद्ध व्हावी ह्या साठी कवी शब्दांची किती ओढाताण करीत हे सांगताना त्यांनी एक वानगीदाखल रचना दिली आहे ,
"उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेंद्र मुखं प्रक्षालयस्व ट : |
प्रभाते रोदिती कुक्कु : चवैतुहि चवैतुहि |
निरर्थक शब्दांचा भरणा , शब्दांची ओढाताण , नको तिथे शब्द तोडणे ,मोडणे ; कवींच्या ह्या सवयीचा त्यांनी मोढ्या खुमासदारपणे आढावा घेतला आहे . पुढे ते म्हणतात , " ऐशी काव्ये कराया ; इकडून तिकडून आणलेली बुद्धी दे चक्रपाणी ! "
.
केशवसुत हे मराठी कवितेचे युगप्रवर्तक ! आद्य क्रांतिकारी कवी . व्यक्ती स्वातंत्र्याची , समतेची , क्रांतीची त्यांनी द्वाही फिरवली . आधुनिक मराठी कवितेचे ते पहिल्या मानाचे मानकरी .कवी आणि काव्य ह्या बद्दल त्यांना उचित अभिमान होता . ह्या टिंगल टवाळी वर त्यांनी प्रथम सणसणीत प्रहार केला . अभिमानाने मान उंचावून , त्यांनी टेचात , खणखणीत जाब विचारला , .
आम्ही कोण म्हणुनी काय पुससी
आम्ही असू लाडके देवाचे
आम्हांला वगळा ,गतप्रभ झणी होतील तारांगणे
आम्हांला वगळा , विकेल कवडीमोलावरी हे जिणे
दिक्कालांतुनी आरपार आमुची दृष्टी पहाया शके
फोले पाखडिता तुम्ही , निवडितो ते सत्व आम्ही निके '
..
ही गर्वोक्ती मुकाट्याने ऐकून घेतील तर ते आचार्य अत्रे कसले . आता कसं आहे अत्रे स्वतः सुद्धा समर्थ साहित्यिक , सिद्धहस्त लेखक , साहित्याच्या ..कलेच्या अनेक प्रांतातून त्यांनी मुशाफिरी केली . ते स्वतः एक चांगले कवी . त्यांनी केशवकुमार ह्या नावाने काव्य निर्मिती केली आहे . त्यांनी विडंबनात्मक उत्तर दिलंय ..,
आम्ही कोण ? म्हणून काय पुसता दात वेंगाडूनि
फोटो मासिक पुस्तकात ना तुम्ही का आमुचा पहिला ?
किंवा 'गुच्छ तरंग ' 'अंजली ' कसा अद्यापि न वाचला ?
चाले ज्यावरी अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रांतुनी ?
ते आम्ही -पर वाग्मयातील करू चोरून भाषांतरे
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी
डोळ्यां देखत घालुनी दरवडा आम्ही कुबेरा घरी
त्यांचे वाग्धन वापरून लपवूनही आमुची लक्तरे
काव्याची भरगच्च घेउनी सदा काखोटीला पोतडी
दाऊ गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे
दोस्तांचे घट बैसवून करूया आम्ही तयांचा उदे
दुष्मनावर एकजात तुटुनी का लोंबवू चामडी
आम्हांला वगळा -गतप्रभ झणी होतील साप्ताहिके
आम्हांला वगळा - खलास सगळी होतील ना मासिके
.
आचार्य अत्रे यांनी विडंबन काव्य केली . त्या नंतर आजतागायत अनेक विडंबन काव्य लिहिली गेली . पण त्यांच्या ' झेंडूची फुले ' ह्या विडंबन काव्य संग्रहाच्या तोडीचा , केवळ विडंबन काव्य असणारा एकही संग्रह आजतागायत नाही . ती व्यक्तीच अफाट होती !
.
प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी कविता करतो असं म्हणतात . मी मात्र अपवाद होते . पण फेसबुक वर माझी 'हायकू ' चारोळ्या ' ह्या काव्य प्रकारांशी ओळख झाली . खूप पूर्वी मी शिरीष पै ( आचार्य अत्रे , यांच्या प्रतिभावान कन्या ) यांच्या हायकू वाचल्या होत्या ,पण फेसबुकवर आल्यानंतर मी प्रथम कविता केल्या . एका समूहाच्या चारोळी स्पर्धेत मला काही वेळा बक्षीसही मिळालं . पण ते तेवढंच , मला कवितेची प्रतिभा नाही हे माझं मलाच लक्षात आलं
.
आजही कवितांची आणि कवीची टिंगलटवाळी होते . काहीजण दुखावतात , त्यांच्या साठी केशवसुत सांगून गेले आहेत , ते त्यांनी कायम लक्षात ठेवावं ,
.
अशी असावी कविता फिरून
तशी नसावी कविता म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
आहांत मोठे , पुसतो तुम्हांला .....

कवितेचा जन्म (२)

कवितेचा  जन्म  ( २ )
.
.
#साहित्याचे , गद्य आणि पद्य असे दोन विभाग केले तर त्यातील पद्य विभाग अधिक समृद्ध आहे . अगदी लहानपणापासून आपला संबंध काव्याशी , लय , तालाशी येतो . बाळाला पाळण्यात ठेवताना ' कुणी गोविंद घ्या .. कुणी गोपाल घ्या .. कुणी माधव घ्या ...' अशी नावं लयीत घेतली जातात . ( मुलीला पाळण्यात घालताना पण असंच म्हटलं जातं का ? की " कुणी लक्ष्मी घ्या .. कुणी सरस्वती घ्या ... " असा काही बदल करतात ? )
.
.नंतर मुल मोठं होत जातं तेव्हांही त्याच्या वाढी बरोबर , 'इथे इथे , इथे इथे नाचरे मोरा ... ; एक पाय नाचीवरे गोविंदा ...; बाळ उभं राहिलं , आम्ही नाही पाहिलं ......, ,चाल चाल बाळा , तुझ्या पायात वाळा .., , अशी कितीतरी सहज सुंदर बडबडगीते म्हटली जातात .
.
इसविसनपूर्व दहा हजार वर्षापूर्वी , " मा निषाद...." ही आद्य कविता , वाल्मिकी आद्य कवी आणि रामायण हे आद्य महाकाव्य मानलं जातं . गद्याच्या आधी पद्याचा जन्म झाला असं मानतात . प्राचीनकाळी सर्वच साहित्य निर्मिती पद्यामध्ये होत होती . गणिता वरील ' लीलावती ' हा ग्रंथ काव्यात आहे . त्या काळातील ज्योतिष शास्त्र , खगोलशास्त्र. , असे दुर्मिळ ; माहितीपूर्ण ग्रंथ पण काव्यात आहेत . पूर्वी यज्ञ करताना आदी मानव ऋचा म्हणत असतं . कवितेचा जन्म इतका प्राचीन आहे .
.
अभ्यासकांनी संत कवी , पंत कवी , तंत कवी असे ढोबळमानाने विभाग केले आहेत . कवितेचे विविध प्रकार आहेत . निसर्ग वर्णनात्मक ( कालिदासाचं , मेघदूत .. सर्वांनाच माहीत असलेलं काव्य ) , खंड काव्य , महा काव्य , दिंडी , लावणी , भलरी ( शेतकरी गीत ) , कोळी गीत , भूपाळी , फटका , भारुड , दशपदी , कणिका अशा विविध कविता . त्यात नंतर चित्रपट गीते , नाट्य गीते यांची भर पडली . शिवाय प्रासंगिक कविता पण होत्या . लग्नाच्या वेळी पारंपरिक मंगलाष्टका ! त्या संपल्यावर हौस म्हणून केलेल्या कविता . डोहाळतुली साठी , बारशाच्या वेळी , विहीणबाईसाठी केलेल्या कविता . मंगळागौर , भोंडला अशा खास प्रसंगासाठी रचलेल्या कविता !
.
मराठीने पर भाषेतील कविता पण आपल्याशा केल्या . हायकू ( जपानी ) सुनीत ( सोनेट ) गझल , रुबाया अशा काव्यामुळे मराठी कविता समृद्ध होत गेली . आधी कविता छंदोबद्ध होती . त्यावेळी कवितेचे नियम पाळण्याच्या प्रयत्नात , अनेक वेळा कविता जटील व्हायच्या . काव्यात मुक्तछंद आला , आणि कविता अधिकाधिक फुलत गेली .
.
.कविता इतकी प्रिय असते की त्यातील अनेक प्रकार आपण नामकरणासाठी स्वीकारले . ओवी , अभंग , श्लोक , कविता , काव्या ,ऋचा , अशी नावे , हौसेने आपण आपल्या मुलांची ठेवतो . पण प्रबंध , नाटक , नाट्यछटा , चरित्र अशी गद्य प्रकारांची नावे सहसा मुलांना ठेवलेली आढळत नाहीत . त्यातल्या त्यात कादंबरी नाव असतं , कथा सुद्धा कदाचित असू शकेल . पण बाकी गद्य प्रकार आपण मुलांच्या नामकरणात टाळतोच .
.
चालीवर म्हटलेलं , गद्यापेक्षा कवितारुपात सांगितलेलं , छंदात लिहीलेलं अधिक चांगलं लक्षात राहत . देवाची स्तुती स्तोत्रात केली आहे , आरती , भजन , कीर्तन हे काव्यात असतं आणि म्हणूनच अनेक वर्ष ते लक्षात राहून एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे अलगद हस्तांतरित होतं .आयुर्वेदाच्या कारिका वृत्तां मधे लिहिल्या आहेत . शास्त्रातील , गणितातील महत्वाची सूत्रे लक्षात ठेवण्यासाठी आपण त्यांना छोटंसं काव्यरूप देतो . लहानपणी झोपाळ्यावर झोके घेत तालावर म्हटलेले पाढे , आठवीत असताना पित्रे सरांनी सुरावर पाठ करून घेतलेलं ' देव: देवौ देवा : ' आणि संस्कृत मधील इतर शब्द , भिडे बाईनी पाठ करून घेतलेलं अलंकारांच गीत .." जाणा वसंततिलका तभजाजगागी ... भुजंगप्रयाती य हे चार येती ' आजही चांगलंच लक्षात आहे .
.
कवितेचा महिमा इतका अगाध असून सुद्धा एकंदरीतच कविता आणि कवी ह्यांची टिंगलटवाळी करण्याकडे एकंदरीत कल असतो #सुरेखा_मोंडकर २७/०८/२०१७
Add photos
#कविता ( २ )
.
कविता हा असा प्रांत आहे की , आवडो न आवडो तिचा उल्लेख नेहमीच होत राहतो . प्राचीनकाळी कवींना राजाश्रय असे . कालिदासा सारखे अनेक कवी राजदरबारी असत . राजाश्रयामुळे त्यांच्या चरितार्थाची सोय व्हायची आणि काव्य निर्मितीला त्यांना स्वस्थता लाभायची . तेव्हांही आणि आताही केवळ लेखनावर उचित अर्थार्जन अशक्यच . लेखन हा एक हौसेचा भाग होता आणि आहे . पैसे मिळवण्यासाठी काहीतरी निराळा उद्योग , धंदा करावा लागतो .
.
मोंगल बदशाहानी , राजस्थानातील राजांनी प्रतिभावान कवींना पदरी ठेवलं होतं . त्यांना भाट , चारण असं ही म्हटलं जायचं . हे कवी प्रामुख्याने आपल्या आश्रयदात्याच्या स्तुतीपर गीत रचायचे . त्यांना मानाचं स्थान होतं . राजे जेव्हां मोहिमेवर निघायचे तेव्हां वीर रसयुक्त , शौर्याला पोषक अशी गीतं गात हे भाट , चारण सैन्याच्या सर्वात पुढे असत . पण हळूहळू ह्या आश्रित कवींचं लांगुलचालन इतकं वाढलं की भाटगिरी करणं हा एक वाकप्रचारच तयार झाला . थोडक्यात मस्का मारणं .
.
तरी देखील अनेक राज कवींनी आपल्या प्रतिभेने काव्य सृष्टीत मानाचं स्थान मिळवलं . बडोदा संस्थानाने अनेक कवींना राजाश्रय दिला . यशवंत दिनकर पेंढारकर ( कवी यशवंत ) , भा . रा . तांबे , चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे हे राजकवी होते . गोपाळ नरहर नातू ( कवी मनमोहन ) यांनी मात्र स्वतःला राजकवी म्हणवून घेण्या पेक्षा लोककवी म्हणवून घेणे अधिक पसंत केलं .
.
कविता म्हणजे गागरमें सागर ! थोड्या शब्दात बरंच काही आपल्याला सांगून जाते . काही शब्दात जीवनाचं सार सांगते . आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन तयार करते . .प्रेरणा देते . कविता हा आपल्या भावविश्वाचा आधार असतो . अनुभव कवीचा असतो , पण त्याचं व्यक्तीकरण , काव्यरूप स्थलकालातीत असतं . म्हणूनच कधीही डफोडील ची फुले पाहिलेली नसली तरी ती कविता आपल्याला आवडते . कवी डाफोडील्स ची कुरणं आपल्या डोळ्यासमोर फुलवतो .
.
तरी देखील आजतागायत कवी हा टवाळकीचा विषय झाला आहे " जे न देखे रवी ,ते देखे कवी , ' असं अभिमानाने म्हणायचं ! प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे ' असं त्याचं कौतुक करायचं ! त्याच्या कवितांना , ' सृजनशील आत्म्याचा उच्चार ' म्हणायचं ! ' भावनांचा उत्स्फूर्त आणि उत्कट आविष्कार म्हणजे कविता ' असं मानायचं आणि त्याच कवीला कवडा म्हणायचं , त्याची टर उडवायची ; हे परंपरेने चालत आलंय .
.
नारायण मुरलीधर गुप्ते , ( कवी बी , १८७२ /१९४७ ) हे आधीपण कविता करत होते , पण त्यांची ' ट ला ट , री ला री | जन म्हणती काव्य करणारी " ही कविता प्रसिद्ध झाली आणि त्यांना अभूतपूर्व अशी प्रसिद्धी मिळाली . म्हणजे काय जे स्वतः काव्य करीत होते त्यांनी पण कवींची खिल्ली उडवली आहे .
.
राम गणेश गडकरी ! कवी , नाटककार , विनोदी लेखक ! बाळकराम ह्या नावाने ते विनोदी लेखन करायचे . " कवीचा कारखाना " ह्या आपल्या विनोदी लेखात , त्यांनी कवींची विनोदी दृष्टीकोनातून मांडणी केली आहे . आपली कविता छंदोबद्ध , वृत्तबद्ध व्हावी ह्या साठी कवी शब्दांची किती ओढाताण करीत हे सांगताना त्यांनी एक वानगीदाखल रचना दिली आहे ,
"उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेंद्र मुखं प्रक्षालयस्व ट : |
प्रभाते रोदिती कुक्कु : चवैतुहि चवैतुहि |
निरर्थक शब्दांचा भरणा , शब्दांची ओढाताण , नको तिथे शब्द तोडणे ,मोडणे ; कवींच्या ह्या सवयीचा त्यांनी मोढ्या खुमासदारपणे आढावा घेतला आहे . पुढे ते म्हणतात , " ऐशी काव्ये कराया ; इकडून तिकडून आणलेली बुद्धी दे चक्रपाणी ! "
.
केशवसुत हे मराठी कवितेचे युगप्रवर्तक ! आद्य क्रांतिकारी कवी . व्यक्ती स्वातंत्र्याची , समतेची , क्रांतीची त्यांनी द्वाही फिरवली . आधुनिक मराठी कवितेचे ते पहिल्या मानाचे मानकरी .कवी आणि काव्य ह्या बद्दल त्यांना उचित अभिमान होता . ह्या टिंगल टवाळी वर त्यांनी प्रथम सणसणीत प्रहार केला . अभिमानाने मान उंचावून , त्यांनी टेचात , खणखणीत जाब विचारला , .
आम्ही कोण म्हणुनी काय पुससी
आम्ही असू लाडके देवाचे
आम्हांला वगळा ,गतप्रभ झणी होतील तारांगणे
आम्हांला वगळा , विकेल कवडीमोलावरी हे जिणे
दिक्कालांतुनी आरपार आमुची दृष्टी पहाया शके
फोले पाखडिता तुम्ही , निवडितो ते सत्व आम्ही निके '
..
ही गर्वोक्ती मुकाट्याने ऐकून घेतील तर ते आचार्य अत्रे कसले . आता कसं आहे अत्रे स्वतः सुद्धा समर्थ साहित्यिक , सिद्धहस्त लेखक , साहित्याच्या ..कलेच्या अनेक प्रांतातून त्यांनी मुशाफिरी केली . ते स्वतः एक चांगले कवी . त्यांनी केशवकुमार ह्या नावाने काव्य निर्मिती केली आहे . त्यांनी विडंबनात्मक उत्तर दिलंय ..,
आम्ही कोण ? म्हणून काय पुसता दात वेंगाडूनि
फोटो मासिक पुस्तकात ना तुम्ही का आमुचा पहिला ?
किंवा 'गुच्छ तरंग ' 'अंजली ' कसा अद्यापि न वाचला ?
चाले ज्यावरी अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रांतुनी ?
ते आम्ही -पर वाग्मयातील करू चोरून भाषांतरे
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी
डोळ्यां देखत घालुनी दरवडा आम्ही कुबेरा घरी
त्यांचे वाग्धन वापरून लपवूनही आमुची लक्तरे
काव्याची भरगच्च घेउनी सदा काखोटीला पोतडी
दाऊ गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे
दोस्तांचे घट बैसवून करूया आम्ही तयांचा उदे
दुष्मनावर एकजात तुटुनी का लोंबवू चामडी
आम्हांला वगळा -गतप्रभ झणी होतील साप्ताहिके
आम्हांला वगळा - खलास सगळी होतील ना मासिके
.
आचार्य अत्रे यांनी विडंबन काव्य केली . त्या नंतर आजतागायत अनेक विडंबन काव्य लिहिली गेली . पण त्यांच्या ' झेंडूची फुले ' ह्या विडंबन काव्य संग्रहाच्या तोडीचा , केवळ विडंबन काव्य असणारा एकही संग्रह आजतागायत नाही . ती व्यक्तीच अफाट होती !
.
प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी कविता करतो असं म्हणतात . मी मात्र अपवाद होते . पण फेसबुक वर माझी 'हायकू ' चारोळ्या ' ह्या काव्य प्रकारांशी ओळख झाली . खूप पूर्वी मी शिरीष पै ( आचार्य अत्रे , यांच्या प्रतिभावान कन्या ) यांच्या हायकू वाचल्या होत्या ,पण फेसबुकवर आल्यानंतर मी प्रथम कविता केल्या . एका समूहाच्या चारोळी स्पर्धेत मला काही वेळा बक्षीसही मिळालं . पण ते तेवढंच , मला कवितेची प्रतिभा नाही हे माझं मलाच लक्षात आलं
.
आजही कवितांची आणि कवीची टिंगलटवाळी होते . काहीजण दुखावतात , त्यांच्या साठी केशवसुत सांगून गेले आहेत , ते त्यांनी कायम लक्षात ठेवावं ,
.
अशी असावी कविता फिरून
तशी नसावी कविता म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
आहांत मोठे , पुसतो तुम्हांला ......#सुरेखा_मोंडकर . २८/०८/२०१७

रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

कविता

Add photos